शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कामगारांना लॉकडाऊनची; उद्योजकांना कामगार गावी जाण्याची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:27 AM

हिंगोली : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासन पुन्हा लॉकडाऊन लावण्यात तयारीत आहे. लॉकडाऊन लागले तर गैरसोय होऊ नये, ...

हिंगोली : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासन पुन्हा लॉकडाऊन लावण्यात तयारीत आहे. लॉकडाऊन लागले तर गैरसोय होऊ नये, यासाठी कामगार गावी परतण्याचे नियोजन करीत आहेत. तर कामगार गावी परत गेले तर व्यवसायाचे कसे होणार याची धास्ती उद्योजकांनी घेतली आहे.

राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मार्च महिन्यात दोन वेळेस संचारबंदीचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला. आता तर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने शासनसुद्धा चिंतेत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याच्या निर्णयापर्यंत शासन पोहचले आहे. त्यामुळे राज्यात केव्हाही लॉकडाऊन लागू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कामानिमित्त आलेले कामगार गावाकडे परत जाण्याच्या तयारीत आहेत. ऊसतोड कामगार तर दोन दिवसांपासून गावी परत येत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात बांधकाम कामगार, उद्योग क्षेत्र, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या परराज्यातील, जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील कामगारांची संख्याही मोठी आहे. आता हे सर्व गावी परत जाण्याचा बेत आखत असल्याचे कामगारांतून बोलले जात आहे, तर कामगार परत गेले तर आपल्या व्यवसाय, उद्योगावर परिणाम होईल, याची भीती व्यावसायिकांना वाटत आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे व्यवसायावर परिणाम झालेला असताना पुन्हा कामगार गावी गेला तर व्यवसाय कोलडून पडण्याची धास्ती उद्योजकांनी घेतली आहे.

कामगार कुठे किती?

औद्योगिक वसाहत - १५०

हॉटेल व्यवसाय - १५००

बांधकाम क्षेत्र : ४३३०७

हाताला काम नाही, इथे तरी काय करणार ?

लॉकडाऊन लागले तर व्यवसाय ठप्प पडतील. त्यामुळे हाताला काम उरणार नाही. हाताला कामच नसेल तर इथे थांबून उपयोग काय, त्यामुळे लॉकडाऊन लागले तर गावाकडे परत जाणार आहे.

-मुन्ना यादव, गढवाल

लॉकडाऊन लागल्यास सर्व व्यवसाय बंद ठेवले जातात. त्यामुळे कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. शिवाय शासनही मदत करीत नाही. त्यामुळे लॉकडाऊन लागल्यास इथे थांबण्यापेक्षा गावाकडे परत जाण्याचा बेत आखला आहे.

-परमवीर सिंग, पंजाब

लॉकडाऊनमध्ये गतवर्षी बांधकाम व्यवसायही ठप्प झाला होता. अगोदरच या व्यवसायात जास्त मजुरी नसते. त्यामुळे लॉकडाऊन काळात खायचे तरी काय ? लॉकडाऊन लागल्यास नक्कीच गावाकडे परत जाणार आहे.

-भगवान कोरडे

कामगार गावी परतला तर ...

लॉकडाऊन लागल्याने कामगार गावी परतला तर व्यवसाय ठप्प होईल. पुन्हा कामगार येतीलच याची श्वाश्वती नसते. तसेच नव्याने व्यवसायाला सुरुवात करावी लागेल. यात मोठे नुकसान होईल.

- राजेश जैस्वाल, हॉटेल व्यावसायिक

लॉकडाऊन लागला तर कामगार गावी परत जातात. गावाकडे गेलेला कामगार पुन्हा परत यायला उशीर करतात. यात व्यवसायाचे नुकसान होते. तसेच लॉकडाऊनमध्ये कामगारांनाही काम उपलब्ध नसते.

- ललीतराज खुराणा, उद्योजक

अगोदरच कामगार मिळत नाहीत. त्यात लॉकडाऊन लागला तर व्यवसाय ठप्प पडेल. त्यामुळे लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांसह कामगारांचेही नुकसान होईल.

- मंजूर खॉ चाँद खॉ पठाण, बांधकाम व्यावसायिक