शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

सरकार शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणत आहे; रास्तारोको आंदोलनात कॉंग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 4:37 PM

हिगोली-जिंतूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प

सेनगाव : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत त्वरीत द्यावी तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासह विविध मागण्यांसाठी तालुका काँग्रसने बुधवारी (दि. ६) हिगोली -जिंतूर रस्त्यावर रस्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकार शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणत आहे असा आरोप केला.

तालुक्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी  हतबल झाला आहे. परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत त्वरीत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी रस्तारोको करण्यात आला. हिगोली -जिंतूर या  मुख्य मार्गावरील टि पाँईडवर  रस्तारोकोमुळे जवळपास तासभर वाहतुक ठप्प झाली होती. वाहनांच्या रस्त्यावर लांबलचक रांगा लागल्या होत्या.

शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे...अतिवृष्टीमुळे तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन,कापूस,झेंडू या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांने जगावे कसे असा सवाल  काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनायकराव देशमुख यांनी या वेळी बोलताना केला. हे सरकार शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणत आहे असा गंभीर आरोप ही त्यांनी यावेळी केला. 

आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनायकराव देशमुख,जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय देशमुख, माजी जि.प.सदस्य द्वारकदास सारडा, युवक लोकसभा उपाध्यक्ष जितु देशमुख, पंचायत समिती सभापती स्वाती देशमुख, रणजित पाटील गोरेगावकर, वामन राठोड, नारायण डुबे,गजानन क्षीरसागर,अनिल पाटील,शालीक देशमुख,भगवान काळबांडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलनcongressकाँग्रेसHingoliहिंगोली