शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

'गंगामाय शांत हो...'; रौद्ररुपी कयाधू नदीची महिलांनी भरली खणा-नारळाने ओटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 16:26 IST

rain in Hingoli : रौद्ररुप धारण केलेल्या नदीमातेला शांत करण्यासाठी ' बोळवण ' करण्याची परंपरा.... 

ठळक मुद्देभरून वाहणारी कयाधू नदी काल रात्री तीन वाजल्यापासून महापुराच्या रुपात आहे.

आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : गेल्या चार दिवसापासून दुथडी भरून वाहणाऱ्या कयाधू नदीने आज रौद्ररूप धारण केले असून परिसरातील सर्व शेती पुराखाली गेली आहे. नदीचे हे विक्राळ रूप शांत करण्यासाठी डोंगरगाव पूल येथील महिलांनी नदीची साडीचोळी, खणा-नारळाने ओटी भरून पूजा केली आहे. ' गंगामाय शांत हो...' असे म्हणत नदीला मनोभावे पूजत हे संकट दूर करण्यासाठी विनंती केली आहे. 

हिंगोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असून काल रात्रीपासून तुफान पाऊस सुरू आहे .या पावसामुळे परिसरातील नदी,नाले ,ओढे ,तुडुंब भरून वाहत असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भरून वाहणारी कयाधू नदी काल रात्री तीन वाजल्यापासून महापुराच्या रुपात आहे. नदीला महापूर आला असून परिसरातील शेती पुराखाली गेली आहे. सोयाबीनचे, हळदीचे, कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूर कमी होईल या आशेवर नदीकाठच्या गावातील लोक बसले होते . परंतु वरचेवर पुराचे पाणी वाढत आहे. बाळापुर नजीक डोंगरगाव पूल येथे नदीने विक्राळ रूप धारण केले आहे. 

Flood : मांजरा नदी काठावर अडकलेल्या २५ जणांची सुटका; बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण

नदीमधील मंदिराचा कळस बुडत असून त्याचा झेंडा बुडला की राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद होतो असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा महापूर शांत व्हावा यासाठी डोंगरगाव येथील महिलांनी नदीची मनोभावे पूजा केली. साडी, चोळी, खारीक खोब-याचे, तांदूळ, हळदीचे कोंब हे साहित्य वाहून नदीची मनोभावे पूजा केली आहे. ' गंगामाय शांत हो...' असे साकडे घातले आहे. ' विक्राळ रूप शांतकरून परिसरात समृद्धी नांदू दे...' असे मागणे यावेळी डोंगरगाव पूल येथील सुनीता क्षीरसागर, संगीता पावडे या महिलांनी पुराच्या पाण्यात पूजा करून केली. तर गावातील सिताराम परसराम शिरफुले यांनी साडी चोळी पुराच्या पात्रात नेऊन सोडली. 

नदी मुलीचे प्रतिकनदीने रौद्ररूप धारण करून परिसरात नुकसान सुरु केले की नदीला शांत करण्यासाठी तिची बोळवण केली जाते. गंगा ही मुलीसमान असून मुलगी रागावली की तिला शांत करण्यासाठी तिची बोळवण करतात अशी प्रथा या नदीकाठच्या गावांमध्ये आहे .आज नदीला महापूर आल्यामुळे तिला शांत करण्यासाठी नदीकाठच्या गावांमध्ये अशा पद्धतीची पूजा सुरू झाली आहे.

गुलाब चक्रीवादळाचा फटका, औरंगाबादेत अनेक भागांतील घरांत घुसले पाणी, झाडे उन्मळून पडली

टॅग्स :RainपाऊसfloodपूरHingoliहिंगोली