शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : हिंगोलीत कृषीची दुकाने रोज सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 20:38 IST

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तसे आदेश काढले आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या टाळेबंदीतून कृषीच्या दुकानांना शिथिलता दिली असून कृषी केंद्र रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तसे आदेश काढले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात आगामी खरिपाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना खते, बी-बियाणे यांचा साठा करण्यासह शेतकऱ्यांनाही खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळण्यासाठी ही तजविज केली. ठिबक, तुषार, पाईप पुरवठा, कृषी यंत्रे, अवजारे, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे सुटे भाग व दुरुस्तीची दुकाने सुरळीत असणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले. तर परवानाधारक कृषी केंद्र रोज ९ ते ५ या वेळेत चालू ठेवता येणार आहे. 

यासाठी दुकान पूर्णपणे सॅनिटाईज करून सुरुवात करावी, कामावरील कामगार, खरेदीदाारचे नाव, संपर्काचा पत्ता, मोबाईल क्रमांक नोंदवणे, दुकानदार व कामगारांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील, सामाजिक अंतराचा नियम ग्राहक व दुकानदारांनी पाळावा, सॅनिटायझर ठेवावे, दुकानांसमोर ग्राहकांसाठी गोल आखणी करावी, कामगारांची थर्मल गनच्या साह्याने तपासणी करावी, दुकानदारांनीच कामगारांना मास्क व सॅनिटायझर द्यावे, दुकानाच्या परिसरात पिण्याचे पाणीव हात धुण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य ठिकाणी करावी, पाणी उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी आदी अटी घालण्यात आल्या आहेत. त्याचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोलीFarmerशेतकरी