शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

Coronavirus : हिंगोलीत कृषीची दुकाने रोज सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 8:35 PM

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तसे आदेश काढले आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या टाळेबंदीतून कृषीच्या दुकानांना शिथिलता दिली असून कृषी केंद्र रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तसे आदेश काढले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात आगामी खरिपाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना खते, बी-बियाणे यांचा साठा करण्यासह शेतकऱ्यांनाही खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळण्यासाठी ही तजविज केली. ठिबक, तुषार, पाईप पुरवठा, कृषी यंत्रे, अवजारे, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे सुटे भाग व दुरुस्तीची दुकाने सुरळीत असणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले. तर परवानाधारक कृषी केंद्र रोज ९ ते ५ या वेळेत चालू ठेवता येणार आहे. 

यासाठी दुकान पूर्णपणे सॅनिटाईज करून सुरुवात करावी, कामावरील कामगार, खरेदीदाारचे नाव, संपर्काचा पत्ता, मोबाईल क्रमांक नोंदवणे, दुकानदार व कामगारांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील, सामाजिक अंतराचा नियम ग्राहक व दुकानदारांनी पाळावा, सॅनिटायझर ठेवावे, दुकानांसमोर ग्राहकांसाठी गोल आखणी करावी, कामगारांची थर्मल गनच्या साह्याने तपासणी करावी, दुकानदारांनीच कामगारांना मास्क व सॅनिटायझर द्यावे, दुकानाच्या परिसरात पिण्याचे पाणीव हात धुण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य ठिकाणी करावी, पाणी उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी आदी अटी घालण्यात आल्या आहेत. त्याचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोलीFarmerशेतकरी