सावधान! तुम्हीसुद्धा जेवल्यानंतर लगेच पाणी पीता? ही सवय ठरू शकते 'या' ४ समस्यांचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 10:31 AM2020-12-27T10:31:54+5:302020-12-27T10:57:20+5:30

Health Tips in Marathi : निरोगी आणि फिट राहण्यासाठी पाण्याचे सेवन कधी करायचं हे लक्षात घ्यायला हवं. 

Drinking water after food is good or bad in hindi water after meal side effects and disadvantages | सावधान! तुम्हीसुद्धा जेवल्यानंतर लगेच पाणी पीता? ही सवय ठरू शकते 'या' ४ समस्यांचं कारण

सावधान! तुम्हीसुद्धा जेवल्यानंतर लगेच पाणी पीता? ही सवय ठरू शकते 'या' ४ समस्यांचं कारण

googlenewsNext

(Image Credit- Allure)

जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची अनेकांची सवय असते. पण हीच सवय आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानं गंभीर आजार होण्याचा धोका असतो. म्हणून जेवल्यानंतर कमीत कमी अर्धा तास थांबून मगच पाण्याचं सेवन करायला हवं. आज आम्ही तुम्हाला खाल्यानंतर  लगेच पाण्याचे सेवन का करू नये. याबाबत अधिक माहिती देणार आहोत. निरोगी आणि फिट राहण्यासाठी पाण्याचे सेवन कधी करायचं हे लक्षात घ्यायला हवं. 

पचनक्रिया कमकुवत होते

खाल्ल्यानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन केल्यास पचनासंबंधित समस्यांचा धोका असतो. पाचन प्रणाली मजबूत ठेवण्यासाठी, खाल्ल्यानंतर अर्ध्या तासानेच पाण्याचे सेवन करावे.

वजन वाढणं

अन्न खाल्ल्यानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन केल्यास वजन वाढू शकते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, जेवणाच्या दोन तास आधी पाणी प्या.

खाने के तुरंत बाद पानी का सेवन करने से पाचन से संबंधित समस्याओं का खतरा रहता है- सांकेतिक तस्वीर

डायबिटीसच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरतं

जेवणानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांना धोकादायक ठरू शकते. जेवणानंतर ताबडतोब पाणी घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

अल्सर

जेवणानंतर लगेच पाण्याचे पाणी प्यायल्यानं अल्सर होण्याची शक्यता असते. खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे गॅस आणि आम्लतेची समस्या देखील उद्भवू शकते. आपण जे अन्न खातो ते बेंबीच्या डाव्या बाजूला असलेल्या जठारात जाऊन पचन क्रिया होते. जठराग्नि खाल्यानंतर एक तासांपर्यंत प्रबळ राहते. आयुर्वेदानुसार जठराची अग्नि ही पचन क्रिया करते. तुम्ही लगेचच पाणी प्यायल्याने जेवण पचण्यास खूप अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदने जेवण आणि पाणी पिण्यामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे.

चिंताजनक! कोरोना पुन्हा नवा अवतार घेणार?; AIIMS च्या संचालकांचा सर्तकतेचा इशारा

पाणी प्यायल्याने ही जठराग्नि समाप्त होते. ही जठराग्नि जेवण पचल्यानंतर शरीराला मुख्य उर्जा आणि प्राण प्रदान करते. त्यामुळे जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने जेवण पचत नाही, गळून जाते. असे केल्यास मोठ्या प्रमाणात गॅस आणि अॅसिडी निर्माण होतो. आयुर्वेदानुसार सकाळी अधिक पाणी पिणे, जेवल्यानंतर त्वरीत पाणी न पिणे हा उत्तम मार्ग आहे. यामुळे आजारांपासून दूर  राहण्यास मदत होते. 

खाना खाने के तुरंत बाद पानी का सेवन करने से कई तरह की बीमारियों का खतरा रहता है- सांकेतिक तस्वीर

पाणी पिण्याची योग्य वेळ

सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या. जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल. जेवल्यानेतर अर्धा तासाने पाणी प्या. व्यायाम करायच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्या. त्यामुळे डिडहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवानं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे.

भारतात पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांचे लसीकरण होणार; पाहा कोणाकोणाला लस मिळणार

योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुम्हाला विचार करण्यासाठी, लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि तरतरीत राहण्यासाठी मदत मिळते. त्यासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुमच्या ऊर्जेतही वाढ होत राहाते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने घाम आणि लघवीच्या माध्यामातून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं. यामुळे किडनी स्टोनसारख्या समस्या होणार नाहीत. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Drinking water after food is good or bad in hindi water after meal side effects and disadvantages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.