शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
7
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
8
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
9
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
10
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
11
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
12
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
13
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
14
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
15
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
16
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
17
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
18
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-महाविद्यालयात गाजणार का तंटामुक्त मोहीम?

By admin | Updated: June 25, 2014 23:52 IST

महाराष्ट्र शासनाने ३० नोव्हेंबर २०१० रोजी एक शासन निर्णय काढून शाळा महाविद्यालयात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेवर आधारित वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले होते.

गोंदिया : महाराष्ट्र शासनाने ३० नोव्हेंबर २०१० रोजी एक शासन निर्णय काढून शाळा महाविद्यालयात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेवर आधारित वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले होते. या निर्णयाला चार वर्षाचा कालावधी लोटत असतानाही जिल्ह्यात एकाही महाविद्यालयात किंवा शाळेत तंटामुक्त वक्तृत्व स्पर्धा किंवा वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली नाही.
तंटामुक्त मोहिमेची प्रखरपणे अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने शाळा महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करावे, असे शासनाने नमूद केले होते. या मोहिमेत व्यापक लोक सहभाग नोंदविण्यासाठी अभिनव संकल्पना निर्माण करून ही मोहीम लोक चळवळ होण्यासाठी जिल्हास्तरावर नेतृत्व प्रदान करायचे होते. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महविद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये विकासात्मक प्रशासनाच्या माध्यमातून राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे. त्याबद्दल त्यांचे आकलन वाढविणे हा उद्देश शासनाचा होता. विद्यार्थ्याना समकालीन समस्याचे यथार्थ ज्ञान व्हावे, ज्ञानाच्या कक्षा रुंदावून आणि सामाजिक अधिक प्रगल्भ व्हाव्यात आणि त्यांचे क्षितीज विस्तारावे यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचे ठरविण्यातआले होते. मोहिमेत तरूणाचा सहभाग वाढावा, भविष्यात सामाजिक राजकीय क्षेत्रात निर्माण होणारे नेतृत्व सजग व क्रियाशील व्हावे, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमापुरत्या मर्यादित शिक्षणात गुंतवून न ठेवता त्यांच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचे विद्यार्थ्याना साक्षेपी आकलन व्हावे, या उद्देशातून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेबाबत प्रत्येक जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात वादविवाद, वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविले होते.
परंतु जिल्ह्यातील एकही शाळेत तंटामुक्त मोहिमेवर आधारित निबंध, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली नाही. तरूणांचा मोहिमेत सहभाग वाढावा याबाबीला जिल्ह्यात तिलांजली देण्यात आली. महाराष्ट्र शासनाने शांततेतून समृध्दीकडे जाण्यासाठी तंटामुक्त मोहीम सुरू केली. या मोहीमेचा मर्म विद्यार्थ्याना माहित व्हावा यासाठी शासनाने ही मोहीम विविध स्पर्धेच्या माध्यामातून शाळा महाविद्यालयात रूजविण्यास सांगितले.
(तालुका प्रतिनिधी)