शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १९ हजार गुरांमागे एक पशुवैद्यकीय अधिकारी

By admin | Updated: June 23, 2014 23:57 IST

कत्तलखान्यासाठी होणारी विक्री, वैरणाची समस्या व यंत्रसामग्रीचा हव्यास यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यात आजारांमुळे मरणाच्या दारी गेलेल्या जनावरांची संख्याही कमी नाही.

गोंदिया : कत्तलखान्यासाठी होणारी विक्री, वैरणाची समस्या व यंत्रसामग्रीचा हव्यास यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यात आजारांमुळे मरणाच्या दारी गेलेल्या जनावरांची संख्याही कमी नाही. परंतू गुरांना निरोगी ठेवण्यासह त्यांच्या संख्यावाढीला चालना देणारी पशुवैद्यकीय यंत्रणा मात्र पांगळी झाली आहे. जिल्ह्यात आजच्या स्थितीत १९ हजार गुरांमागे केवळ एक पशुवैद्यकीय अधिकारी असे प्रमाण आहे. त्यामुळे गुरांना आरोग्याबाबत शासन-प्रशासन किती जागरूक आहे याची कल्पना येते.
जिल्ह्याभरात १०२ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ६८ पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी २१ रिक्त असल्यामुळे केवळ ४७ डॉक्टरांवरच कारभार चालत आहे. एकूण ८ लाख ९२ हजार ७२७ गुरांचे आरोग्य हे ४८ डॉक्टर कसे सांभाळत असतील याची कल्पनाच केलेली बरी.
सन २००७ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात गाय वर्गात ३ लाख ८८ हजार ५३०, म्हैस वर्गातील १ लाख १ हजार ६३४, शेळ्या वर्गातील १ लाख ५९ हजार ३१०, मेंढ्या २०, कोंबड्या ३ लाख ७ हजार ८९०, डुकरे ३ हजार ८८७, तर २६ घोडे होते. मात्र सन २०१२ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात गाय वर्गातील ३ लाख ३४ हजार ६७२ जनावरे आहेत. म्हैस वर्गातील ८९ हजार ५६४ जनावरे, शेळ्या वर्गातील १ लाख ५५ हजार ८०६ तर मेंढ्या वर्गातील ९३५ जनावरे आहेत. ५ वर्षाची तुलना पाहता ५३ हजार ८५८ गायी आणि १२ हजार ७० म्हैस वर्गातील जनावरे कमी झाली आहे. ५ वर्षात ६५ हजार ९२८ जनावरे कमी झाली आहेत. एकीकडे माणसांची लोकसंख्या वाढत आहे, मात्र दुभत्या जनावरांची संख्या कमी होत असल्याने दुधात भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
जनावरांना विशेष करून पावसाळ्यात घटसर्प, एकटांग्या, तोंडखुरी, पायखुरी, शेळ्यांना आंतर विषार व पिपीआर असे आजार होतात. या आजारांवर आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व दवाखान्यांना ३ लाख ९० हजार लसींचा पुरवठा करण्यात आला. जनावरांची घटती संख्या पाहून पशुसंवर्धन विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. अनुसूचित जातीच्या व जमातीच्या व्यक्तींना दुधाळू जनावरांचे वाटप केले जातो. दुधाळू जनावरांना खाद्य पुरवठाही केला जातो. संकरीत वासरांना खाद्यान्न वाटप केले जाते. अनुसूचित जाती/जमातीच्या लोकांना शेळ्या व तलंगाचे वाटप केले जाते. शेतकऱ्यांनी जनावरांचे संवर्धन करावे, यासाठी जिल्ह्यातील १६४० शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
वैरण विकास कार्यक्रमांतर्गत ७४ लोकांना कडबाकुटी यंत्र, तर १८ जणांना मुरघास युनिट वाटप करण्यात आले आहे. मुर्रा जातीचे वळू व म्हैस १२ वाटप करण्यात आले आहे. नावीन्यपुर्ण योजनेंतर्गत ५२ लोकांना दुधाळू जनावरे तर ७१ लोकांना शेळी वाटप करण्यात आले. कृत्रीम रेतनाचे काम वाढविण्यासाठी यावर्षी ५५ सेवा देणारे कृत्रीम रेतनकेंद्र जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)