लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास अर्धा तास झालेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले तर कापणी करुन ठेवलेल्या धानाच्या कडपा मोठ्या प्रमाणात भिजल्याने धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांवर आणि शेतामध्ये पाणी साचले होते. जिल्ह्यात सध्या धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरु आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात कापणी केलेला धान बांध्यामध्ये पडून असून अवकाळी पावसामुळे धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खरीप हंगामातील धान खरेदीला सुरुवात झाली असून बऱ्याच शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी खरेदी केंद्रावर नेला आहे. मात्र शुक्रवारी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांची सुध्दा चांगलीच तारांबळ उडाली होती. धानाचे पोते भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच यावर्षी शेतकरी विविध नैसर्गिक संकटाना तोंड देत आहे. त्यातच अवकाळी पावसाने त्या भर घातल्याने शेतकऱ्याना आर्थीक फटका बसला.
अवकाळी पावसाचा धानपिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 5:00 AM
हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांवर आणि शेतामध्ये पाणी साचले होते. जिल्ह्यात सध्या धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरु आहे.
ठळक मुद्देखरेदी केंद्रावरील धानाचे नुकसान : जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी