शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

दाढीला हात लावण्यासाठी हातांनी भाेगला दोन महिन्यांचा वनवास ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षीपासून तळहातावर कमवून खाणाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. कधी लॉकडाऊन लागेल आणि पोट भरणे ...

गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षीपासून तळहातावर कमवून खाणाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. कधी लॉकडाऊन लागेल आणि पोट भरणे कधी मुश्कील होईल हे आज घडीला सांगता येत नाही. अशीच धास्ती छोट्या-छोट्या व्यावसायिकांमध्ये झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे पोट भरणे अत्यंत कठीण झाले आहे. दररोज १० ते १५ लोकांची कटींग, दाढी करून आपले जीवन जगणाऱ्या कारागिरांचे हात दाढीला लावण्यासाठी आतुरलेेले होते. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे नाभिकांची दुकाने बंदच होती. परंतु घरी दाढी करणाऱ्या कारागिरांकडे कुणीच भटकले नाहीत. यामुळे पोट भरण्यासाठी रोजगार हमी योजनेचे काम,घरकूल बांधकामाची मजुरी करून पोट भरावे लागले.

आमगाव तालुक्याच्या जवरी येथील रितेश मेश्राम यांच्याशी चर्चा केली असता त्याने कोरोना काळातील अत्यंत परिस्थिती बिकट असल्याचे सांगितले. मागच्यावर्षी कोरोनाच्या संकटाने दोन महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु पूर्वीपासून कमवून ठेवलेले काही पैसे जवळ असल्याने मागच्या वर्षी दोन महिने लॉकडाऊन असतानाही त्रास झाला नव्हता. परंतु यंदा एप्रिल व मे या दोन महिन्यातील संचारबंदीने आमची हालत खस्ता झाल्याचे सांगितले. पहिल्या लॉकडाऊनमध्ये जे कमावून ठेवले होते ते गेले. त्या प्रक्रियेतून सावरण्याचा प्रयत्न असताना लॉकडाऊन खुलल्यानंतरही ग्राहक भटकत नव्हते. दिवसभर वाट पाहून दोन-चार ग्राहक आले त्यातून मिळालेल्या मिळकतीतून घर चालविण्याचा प्रयत्न असायचा. यातून हात उसनवारी वाढली.

...........

आंबील चटणीवर काढले दिवस

कटींग, दाढी करून येणाऱ्या मिळकतीतूनच घर संसार चालवित असतो. दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्याने मोठा त्रास झाला. त्यातच यंदा दुसऱ्यांदा कोरोनामुळे संचारबंदी झाल्याने पोट भरणे मुश्कील झाले. सरकारनेही मदत केली नाही. हाताला काम नाही, पोटाची आग विझवावी कशी? कुणी उसनवारीवर पैसे किंवा साहित्य देत नव्हते. यातच कशीबशी ओढाताण करून आंबील, चटणीवर दिवस काढले.

.............

मजुरी करुन केला उदरनिर्वाह

सरकारने ग्रामीण भागात घरकूल दिलेत त्या घरकुलाच्या कामावर जाऊन आपल्या कुटुंबाचे पोषण केले. पारंपरिक व्यवसाय करताना आमच्या व्यवसायाला कुणाची मदत मिळाली नाही. १४ महिन्याच्या काळात चार महिने आमचा व्यवसाय बंद ठेवावा लागला. मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे पोषण करावे कसे? साहित्याच्या किमती वाढल्याने खर्च वाढला परंतु उत्पन्न अत्यल्प असल्याने संसाराचा गाडा कसा रेटायचा हा प्रश्न असल्याचे रितेश मेश्राम यांनी सांगितले.