शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘बाघ’चे उन्हाळी नियोजन कोलमडले

By admin | Updated: December 25, 2014 23:33 IST

जिल्ह्यात रबी हंगामासाठी (उन्हाळी) धानाचा पेरा करताना यावर्षी शेतकऱ्यांना मोठी अडचण जाणार आहे. इटियाडोह प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यासोबत आता बाघ प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या

केवळ ९६१ हेक्टरला लाभ : गतवर्षीच्या तुलनेत सहापटीने घट
गोंदिया : जिल्ह्यात रबी हंगामासाठी (उन्हाळी) धानाचा पेरा करताना यावर्षी शेतकऱ्यांना मोठी अडचण जाणार आहे. इटियाडोह प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यासोबत आता बाघ प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही यावर्षी सिंचनापासून वंचित राहावे लागणार आहे. केवळ ९६१ हेक्टरमध्ये रबी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे नियोजन सहा पटींनी कमी आहे.
बाघ कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत यावर्षीच्या रबी हंगामासाठी पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले. त्यात सर्वाधिक गोंदिया तालुक्यात ४४२ हेक्टरला, आमगाव तालुक्यात २९८ हेक्टरला तर सालेकसा तालुक्यात २०६ हेक्टरला असे एकूण ९६१ हेक्टरला बाघ प्रकल्पाचे पाणी मिळणार आहे. गेल्यावर्षी याच बाघ प्रकल्पातून ६००० हेक्टर सिंचनाचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे ७५४५ हेक्टरला सिंचन करण्यात आले. यावर्षी मात्र परिस्थिती अगदी विपरित आहे.
यावर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे खरीप हंगामात पिकांसाठी पाणी सोडावे लागले. त्यामुळे आधीच पाण्याची पातळी कमी असताना जलसाठाही अपुरा झाला. त्यामुळे रबी हंगामासाठीचे नियोजन पार कोलमडून गेले. गतवर्षीच्या तुलनेत एकदम सहा पटीने सिंचन क्षेत्र कमी करावे लागले. गेल्यावर्षी १०८.७६ दलघमी जलसाठा होता. मात्र यावर्षी केवळ १७.४९ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेले पाणी मिळविण्यासाठी निर्धारित मुदतीत पाणीपट्टी थकबाकीचा भरणा करावा, तसेच उन्हाळी हंगाम २०१४-१५ ची आगाऊ पाणीपट्टी रक्कम भरावी. तसेच सुरळीत ओलीत होण्याच्या दृष्टीने आपल्या शेतातील पाटचाऱ्या साफ, स्वच्छ व प्रवाहक्षम करून ठेवाव्या, तसेच पाण्याचा योग्य वापर करावा, अशा सूचना कार्यकारी अभियंता गोन्नाडे यांनी केल्या आहेत.
बाघ व्यवस्थापन शाखा सालेकसा, आमगाव आणि पुजारीटोला येथील विद्युत पंपधारकांसाठी दिलेल्या मंजूर क्षेत्राच्या अर्ध्या क्षेत्रात उन्हाळी धानपिक घेण्याची मंजुरी देण्यात आली आहे. मात्र कामठा व कालीमाटी शाखेतील पंपधारकांना या हंगामात सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात येणार नाही, असे बाघ इटियाडोह प्रकल्प कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)