शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी उन्हाळी सिंचनात होणार चारपटीने वाढ

By admin | Updated: April 22, 2017 02:30 IST

गेल्यावर्षीच्या उन्हाळ्यापेक्षा यावर्षीच्या उन्हाळ्यात जलसाठ्याची स्थिती बरीच चांगली आहे.

१५ मे पर्यंत आवश्यकतेनुसार सोडणार पाणी : प्रकल्पांमध्ये २५ टक्के उपयुक्त जलसाठा गोंदिया : गेल्यावर्षीच्या उन्हाळ्यापेक्षा यावर्षीच्या उन्हाळ्यात जलसाठ्याची स्थिती बरीच चांगली आहे. त्यामुळे उन्हाळी धानाचे क्षेत्र वाढले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत उन्हाळी सिंचन चार पटीने वाढणार आहे. येत्या १५ मे पर्यंत आवश्यकतेनुसार मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. गेल्यावर्षी जलाशयांमधील पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत खराब होती. उपयुक्त जलसाठाच नसल्यामुळे मोठ्या प्रकल्पांमधून गेल्यावर्षी अवघ्या ११८० हेक्टरला पाणी देण्याचे नियोजन केले होते. यावर्षी मात्र पावसाळ्यात योग्यवेळी पाऊस झाल्याने खरीब हंगामात पिकांसाठी पाणी सोडण्याची वेळ आली नाही. परिणामी जलाशयांमध्ये जलसाठा कायम राहिला. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांमधून यावर्षी उन्हाळी धानासाठी ४०६० हेक्टरला सिंचन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ईटियाडोह, शिरपूर, पुजारीटोला, कालीसरार, धापेवाडा आणि मध्यप्रदेशातील संजय सरोवर या सहा मोठ्या प्रकल्पांमधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी कालीसरार वगळता इतर सर्व जलाशयांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. त्यात ईटियाडोह प्रकल्पात आता १३०.४० दलघमी (४१ टक्के) उपयुक्त जलसाठा आहे. गेल्यावर्षी यावेळी तो अवघा ५६.८४ (७.८२ टक्के) होता. शिरपूर जलाशयात ४८.९७ दलघमी (३०.६५ टक्के) जलसाठा आहे. गेल्यावर्षी यावेळी त्या जलशयात अवघा १०.६० दलघमी (६.६४ टक्के) जलसाठा होता. पुजारीटोला धरणात २३.५६ दलघमी (५४.१२ टक्के) जलसाठा आहे. गेल्यावर्षी जवळपास एवढाच म्हणजे २३.६८ दलघमी जलसाठा होता. कालीसरार धरणात मात्र यावर्षी कोणताही जलसाठा शिल्लक नाही. तिरोडा तालुक्यातील धापेवाडा प्रकल्पात १२.८५ दलघमी (२९.१८ टक्के) जलसाठा आहे. गेल्यावर्षी या जलाशयात आताच्या पेक्षा जास्त म्हणजे १५.६४ दलघमी (३४ टक्के) जलसाठा होता. मध्यप्रदेशातील संजय सरोवरमधून गोंदिया जिल्ह्याला पाण्याचा वाटा मिळतो. त्या जलाशयात आता १६.६४ दलघमी (४ टक्के) उपयुक्त दलसाठा आहे. गेल्यावर्षी याचवेळी २.७४ दलघमी (०.६७ टक्के) होता. (जिल्हा प्रतिनिधी) पाणी पोहोचतच नाही यावर्षी प्रकल्पांमध्ये पाणी असूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत हे पाणी पोहोचत नाही. अनेक ठिकाणचे कालवे नादुरूस्त आहेत. त्या कालव्यांच्या दुरूस्तीसाठी पुरेसा निधी नाही. त्यामुळे पाणी सोडूनही ते कालव्यातून वाहत पुढे न जाता मध्येच झिरपते. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतात ते पाणी पोहोचणे कठीण जात आहे.