शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना २१ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

रेल्वेकडून विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी सातत्याने विशेष अभियान राबविले जाते. मात्र तरिही बिना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. यातच मंडळ रेल प्रबंधक शोभना बंदोपाध्याय यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक के.वी.रमणा यांच्या मार्गदर्शनात वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांनी तिकीट तपासणी कर्मचारी व रेल्वे सुरक्षा बल .....

ठळक मुद्देरेल्वे विभागाचे विशेष तिकिट तपासणी अभियान : ८८४७ प्रकरणांची केली नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विना तिकीट रेल्वेत प्रवास करणाऱ्यांची संख्या नियंत्रणात यावी यासाठी ९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान विशेष तिकीट तपासणी अभियान दक्षिण-पूर्व- मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या वाणिज्य विभागाकडून राबविण्यात आले. यात ८८४७ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून प्रवाशांना २१ लाख २९ हजार ३१५ रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.रेल्वेकडून विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी सातत्याने विशेष अभियान राबविले जाते. मात्र तरिही बिना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. यातच मंडळ रेल प्रबंधक शोभना बंदोपाध्याय यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक के.वी.रमणा यांच्या मार्गदर्शनात वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांनी तिकीट तपासणी कर्मचारी व रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या मदतीने ९ ते २२ फेबु्रवारी दरम्यान विशेष तिकीट तपासणी अभियान राबविले.यामध्ये बिना तिकीट प्रवास करणाऱ्यांचे एक हजार १६८ प्रकरण हाती लागले. ज्यामध्ये संबंधितांकडून सहा लाख ४० हजार ५६५ रूपये दंड वसुल करण्याात आला.त्याचप्रकारे अनियमीत तिकीटांचे दोन हजार ५३० प्रकरण पकडण्यात आले. ज्यामध्ये संबंधितांकडून नऊ लाख ६३ हजार ८२५ व बिना माल बुक करून सामान ठेवणाऱ्यांचे पाच हजार १४९ प्रकरण पकडून त्यांना पाच लाख २४ हजार ९२५ रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.अशाप्रकारे १४ दिवस राबविण्यात आलेल्या या विशेष अभियानात एकूण आठ हजार ८४७ प्रकरणांत रेल्वेने २१ लाख २९ हजार ३१५ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.कचरा फेकणाऱ्यांनाही दिला दणकादेशात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जात असून आपल्या सारखेच आपण वावरत असलेला परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जात आहे. स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात असून स्वच्छता हाच उत्तम आरोग्याचा मंत्र म्हणून जनजागृती केली जात आहे. अशात मात्र कित्येकांना स्वच्छतेची पथ्य दिसते. अशात कचरा फेकणाऱ्या १०१ प्रकरणांत या विशेष अभियानंर्तत १० हजार ३०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

टॅग्स :railwayरेल्वे