शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेती व स्वयंरोजगार प्रशिक्षण

By admin | Updated: November 26, 2014 23:09 IST

अदानी फाऊंडेशन तिरोडा तर्फे शैक्षणिक विकास, ग्रामीण आरोग्य, शास्वत उपजिवीका व ग्रामीण संसाधन विकासावर आधारीत उपक्रम राबविले जात आहेत. यापैकी शास्वत उपजिवीका

गोंदिया : अदानी फाऊंडेशन तिरोडा तर्फे शैक्षणिक विकास, ग्रामीण आरोग्य, शास्वत उपजिवीका व ग्रामीण संसाधन विकासावर आधारीत उपक्रम राबविले जात आहेत. यापैकी शास्वत उपजिवीका या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उपजिवीकेत सुधार घडवून आणण्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेती पद्धती व गाईच्या आधारे शेती कशाप्रकारे केली जाते या विषयाचे तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण ८५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यामध्ये ग्राम चिरेखनी येथील ३०, जमुनिया येथील २१ आणि खमारी येथील ३४ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणामध्ये उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सेंंद्रिय शेती, गाईच्या आधारे शेती, गांडुळ खत निर्मिती, कंपोस्ट खत निर्मिती, गाईचे शेण व गोमुत्रापासून तयार होणाऱ्या औषधी व वस्तु किटनियंत्रके प्रशिक्षण देणे हे होते.
सुनिल मानसिंघका समन्वयक गो-विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार यांनी देशी वंशाच्या गाईचे शेण व गोमुत्रापासून तयार होणाऱ्या विविध औषधी व वस्तु याविषयी माहिती तसेच सुबोधकुमार सिंग, समन्वयक अदानी फाऊंडेशन तिरोडा यांनी सेंद्रिय शेती पद्धती व गाईच्या आधारे स्वयंरोजगार कशाप्रकारे केला जातो. तसेच दिवाकर नेरकर गो-विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार यांनी गाईचे आपल्या जीवनातील महत्व कचरे से कांचन तसेच सतीश राव झारखंड यांनी रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्यपरिणाम व जैविक शेतीची आवश्यकता या विषयी योग्य मार्गदर्शन सर्व प्रशिक्षणार्थ्यांना केले.
गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे गोमुत्र अर्क हे गुणकारी औषध तयार केले जाते. तसेच गोवंशावर आधारित विविध उत्पादने तयार केली जातात. एका गाईचे गोमुत्र दहा एकर जमिनीची फवारणी सहज करुन शकतो. जमिनीतील घज्ञतक विषद्रव्ये संपवून जमीन सजीव करण्याची क्षमता केवळ देशी वंशाच्या गायीच्या शेणात व गोमुत्रातच आहे. एक देशी वंशाची गाय प्रती दिवस ८ ते १० किलो शेण देते. गाईचे शेण व कचऱ्या पासून गांडूळ खत तयार करता येते. एका महिन्यामध्ये ५०० किलो गांडूळ खत तयार होते. बाजारामध्ये गांडूळ खताची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. म्हणजेच एका गाईच्या शेणापासून २५०० रुपयाचे उत्पन्न प्रत्येक महिन्याला मिळतो.
अदानी फाऊंडेशनचे स्वच्छता अभियानाकडे आर्थिक दृष्टीने पहाणे सुरु केले आहे. संपुर्ण सेंद्रिय कचऱ्यापासून उत्पन्न मिळविले जाऊ शकते. गावामध्ये मुख्यरुपात कचरा कृषी उत्पादन पशुपालन आणि स्वयंपाक घरातुन प्राप्त होतो. या कचऱ्यापासून गांडुळखत बनवून भरपुर प्रमाणात उत्पन्न घेता येते. हा प्रकल्प ५० गावांमध्ये राबविणार आहे.