शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी जनगणनेसाठी साकडे

By admin | Updated: November 24, 2014 23:00 IST

ओबीसींची जनगणना व्हावी तसेच शैक्षणिक क्षेत्रासह नोकरीत लोकसंख्येच्या आधारावर नोकरी मिळावी या मागण्यांना घेऊन गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्याचे

गोंदिया : ओबीसींची जनगणना व्हावी तसेच शैक्षणिक क्षेत्रासह नोकरीत लोकसंख्येच्या आधारावर नोकरी मिळावी या मागण्यांना घेऊन गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकारी यांना तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात घटनेच्या ३४० व्या कलमात अनुच्छेद तयार करुन ओबीसीसाठी स्वतंत्र ओबीसी आयोग व ओबीसी मंत्रालयाची तरतूद करण्यात यावे, ओबीसी समाजाची जनगनणा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या वतीने दाखल करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र मागे घेऊन ओबीसींची जनगणना त्वरीत करण्यात यावी. १० मे २०१० रोजी ओबीसी जनणगणनेची केलेल्या घोषणेची सरकारने अंमलबजावणी करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावे, ओबीसी विद्यार्थ्यांना मढकोत्तर व मॅट्रीकपुर्ण शिष्यवृत्ती १९९८ मध्ये केंद्राने लागू केली ती त्वरीत सुरु करुन केंद्र व राज्यसरकारकडे असलेली शिष्यवृत्तीची थकबाकी विद्यार्थ्यांना देण्यात यावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व शिष्यवृत्तीसाठी क्रीमीलेयरची मर्यादा सारखीच ठेवावी. यात शिष्यवृत्तीसाठी साडे चार लाख व शैक्षणिक प्रवेशासाठी ठेवण्यात आलेली ६ लाखाची अट रद्द करुन सरसकट ६ लाख ठेवण्यात यावे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ओबीसींना नोकरीत खुल्या प्रवर्गात देण्यात येणाऱ्या सुविधा बंद करण्याचा काढलेला आदेश त्वरीत रद्द करावे, ओबीसी कर्मचारी, अधिकारी यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करण्यात यावे. बेरोजगार युवकांसाठी एमआडीसी उद्योग प्रकल्पातील नोकरीत व भुखंडात आरक्षण देण्यात यावे. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला लोकसंख्येच्या १० टक्के तरतूद करुन उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात यावे. केंद्र व राज्यात उपघटक योजना सुरु करण्यात यावी. शिष्यवृत्ती शुल्क परतावा योजनेत उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपये करुन शंभर टक्के शुल्क परतावा देण्यात यावे आदी मागण्याचा समावेश होता. निवेदन अमर बऱ्हाडे, कैलाश , राजेश नागरिकर, खेमेंद्र कटरे, आशिष नागपूरे, चंद्रकुमार बहेकार, सुनील लांजेवार, शिशिर कटरे, सावन डोये, मनीष मुनेश्वर, रेखलाल टेंभरे, पंकज रहांगडाले, ओमप्रकाश सपाटे, महेश कोरे यांचा समावेश होता.