शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

न.प.ला करवसुलीचा विसर

By admin | Updated: December 27, 2014 01:59 IST

११ कोटींच्या कर वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी गोंदिया नगर परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे करवसुली अधिकारी देण्याची मागणी करणारा ठराव १० डिसेंबर....

गोंदिया : ११ कोटींच्या कर वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी गोंदिया नगर परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे करवसुली अधिकारी देण्याची मागणी करणारा ठराव १० डिसेंबर रोजी पार पडलेल्या आमसभेत मंजूर केला. मात्र प्रत्यक्षात १५ दिवस उलटूनही जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याबाबतची मागणीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे करवसुलीबाबत नगर परिषद किती गंभीर आहे, याचा प्रत्यय येत आहे.
आतापर्यंत न.प. प्रशासनाने लेखी स्वरूपात कुठलाच पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांसोबत केलेला नाही. ११ कोटींच्या कर थकबाकीचे लक्ष्य गाठण्यासाठी आता अवघे तीन महिने उरले असताना पालिकेची ही उदासीनता अनेक शंकांना वाट मोकळी करून देत आहे.
नगर पालिकेचा अधिकांश कारभार करस्वरूपात येत असलेल्या उत्पन्नातून चालतो. विशेष म्हणजे कर वसुलीच्या प्रमाणावरच पालिकेला शासनाकडून अनुदान प्राप्त होते. तर पालिकेत कार्यरत रोजंदारी कर्मचाऱ्यांचे भवितव्यही कर वसुलीवरच अवलंबून आहे. असे असतानाही गोंदिया नगर परिषदेचा रहीसी थाट काही औरच आहे. पालिकेचा कर वसुली विभाग कुठे तरी कमी पडत असल्याने ११ कोटींच्या कर वसुलीचे डोंगर पालिकेच्या डोक्यावर आहे. यामुळे अर्थातच शासकीय अनुदानावर प्रभाव पडणार आहे.
करवसुलीचा हा गंभीर प्रश्न लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी मध्यंतरी पालिकेत एक दिवस तळ ठोकून कर विभागाची क्लास घेतली होती. यानंतर पालिकेने थोडी फार फुर्ती दाखवित कर वसुलीसाठी एक नवा प्रयोग हाती घेण्याचे ठरविले. तो असा की, महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १६८ (१) नुसार पालिकेला जिल्हाधिकाऱ्यांकडे कर वसुली अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी करण्याचा. यातंर्गत पालिकेने १० डिसेंबर रोजी पार पडलेल्या आमसभेत तसा प्रस्ताव मांडून त्यांना मंजूरी मिळवून घेतली.
विशेष म्हणजे, आमसभेनंतर लगेच जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात पत्र देऊन कर वसुली अधिकाऱ्यांची मागणी केली जाणार असून १ जानेवारीपर्यंत अधिकारी मिळणार असल्याचा अंदाज मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी वतर्विला होता. मात्र आमसभेला आता १५ दिवस लोेटले असूनही पालिकेने लेखी स्वरूपात पत्रव्यवहार करून जिल्हाधिकाऱ्यांना कर वसुली अधिकाऱ्यांची मागणी केलेली नाही. अशात आता हा पत्र व्यवहार कधी होणार व कधी कर वसुली अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार ही बाब एक प्रश्नचिन्ह बनली आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी मोरे यांना मोबाईलवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी)