शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

आता निर्मल गावांची वाटचाल पुन्हा हागणदारीकडे

By admin | Updated: June 25, 2014 00:31 IST

संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात हागणदारीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले होते. त्यावेळी अनेक गावे हागणदारीमुक्त झाली. मात्र हागणदारीमुक्त गावांतील रस्त्यावरच

गोंदिया : संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात हागणदारीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले होते. त्यावेळी अनेक गावे हागणदारीमुक्त झाली. मात्र हागणदारीमुक्त गावांतील रस्त्यावरच नागरिक शौचास बसत असल्याने पुन्हा एकदा हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करण्याची गरज आहे.
प्रशासनाचे सहकार्य व कर्तव्यदक्ष अधिकारी असले तरच अभियान प्रामाणिकपणे राबविल्या जाते. अन्यथा त्याचा नागरिकांवर कोणताही परिणाम होत नाही. नागरिक या अभियानाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. जिल्ह्यात अनेक गावांच्या नागरिकांनी स्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. स्वच्छता अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावाला भेटी देऊन नागरिकांना आरोग्याचे तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांचे मत परिवर्तन करण्यात यश मिळविले होते. ज्यांना याबाबत काही अडचणी असतील तर त्या जाणून घेऊन तालुक्याच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून मार्ग काढण्यात मदत केली होती.
जिल्ह्यातील प्रत्येक गाव हागणदारीमुक्त झाले पाहिजे ही त्या मागचा उद्देश होता. मात्र ज्या गावांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला अशा गावात रासेयो शिबिरे घेण्यात आली होती. रासेयोच्या विद्यार्थ्यांनी गावात ज्यांच्याकडे वैयक्तिक शौचालये नाहीत. त्यांच्याकडे शोषखड्डे खोदून दिले. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना शासनाने सुरूवातीला ६०० रूपये, १२०० नंतर २४०० रुपयांचे अनुदान दिले. परंतु अनेक ग्राम पंचायतीच्या ग्रामसेवकांनी अनुदानामध्येसुध्दा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. या भ्रष्ट्राचाराची चौकशी करण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत पथकही नेमण्यात आले होते. हे पथक गावात सकाळी, संध्याकाळी भेटी देत असत.
उघड्यावर शौचास बसणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला होता. प्रशासनाच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली होती.
नागरिकांना शौचालय बांधण्यास सक्ती करण्यात येत होती. यात कुठेही वाद निर्माण झाल्यास त्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत होती. कायद्याचा धाक निर्माण करून तर कधी जागरूक करुन मोहीम राबविण्यात येत होती. यामुळे गावे हागणदारीमुक्तीचे महत्त्व नागरिकांना पटल्यामुळे अनेक शौचालये गावागावांत बांधण्यात आली. अनेक गावात खुद्द ग्रा.पं. पदाधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांचेकडेच शौचालय नसल्याचे आढळून आले. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत होती. तेवढीच तत्परता दाखवून अभियान राबविण्यात आले होते. शौचालय न बांधणाऱ्यांनी नळजोडणी काढून घेऊन, रेशन बंद करून त्यांचेवर शौचालय बांधणे सक्तीचे करण्यात आले होते. काही गावांनी समजूतदारपणा दाखवीत या अभियानांतर्गत आपले गाव हागणदारीमुक्त केले. परंतु अनेक गावे अद्यापही याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
सद्यस्थितीत मात्र या अभियानाचा कुठेही प्रभाव दिसून येत नाही. एकंदरीत या अभियानाचा जिल्ह्यातील काही भागात पूर्णत: फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसून येते. काही लाभार्थ्यांनी केवळ नावापुरतेच शौचालये बांधून ठेवली आहे. तर काहींनी केवळ अनुदान उचलले व शौचालयाचे बांधकाम मात्र केले नाही. सकाळी गावात भेट देणाऱ्या अधिकारी वर्गापासून आता सुटका झाल्याचे समाधान काहीजण व्यक्त करीत आहेत. नागरिकांवर कायद्याचा बडगा असूनही त्यांची अंमलबजावणी करणारे तर प्रभावी नसेल तर नागरिकांवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.
आपले भले कशात आहे, ही बाब नागरिकांना पटवून सांगणे हे कौशल्य प्रत्येकाला जमलेच असे नाही. हागणदारीमुक्त योजनेचा फज्जा उडाला आहे. सदर अभियानाची जिल्ह्यात यशस्वीपणे अमंलबजावणी करण्याकरिता संबंधित विभागाचे अधिकारी पुन्हा कामाले लागले आहेत. (तालुका प्रतिनिधी)