शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट केले जाणार

By admin | Updated: February 7, 2016 02:32 IST

ओबीसी समाजासाठी असलेल्या सवलतींपासून वंचित असलेल्या लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी दिले.

उमा भारती : बिरसी विमानतळावर भाजपातर्फे स्वागतगोंदिया : ओबीसी समाजासाठी असलेल्या सवलतींपासून वंचित असलेल्या लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी दिले. रायपूरवरून छिंदवाडा येथे जाण्यासाठी बिरसी विमानतळावर शुक्रवारी त्या आल्या होत्या. यावेळी भाजप व लोधी समाज शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ. भेरसिंग नागपुरे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि. प. सभापती छाया दसरे, न.प. गटनेता दिनेश दादरीवाल, शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय, दीपक कदम, जि.प. सदस्य कमलेश्वरी लिल्हारे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने, महाराष्ट्रातील लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्यात यावे, ज्यामुळे महाराष्ट्रातील लोधी समाजातील सुशिक्षित तरूणांना केंद्रीय नोकरभरतीत आरक्षणाचा लाभ होईल. लोधी समाज हा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला असल्याने महाराष्ट्र शासनाने २००४ मध्ये या समाजाला इतर मागास प्रवर्गात समाविष्ट केले आहे. राज्यात ज्याप्रमाणे या आरक्षणाच्या सुविधा प्राप्त आहेत, तशा केंद्रातील यादीत लोधी समाजाचे नाव नसल्याने ओबीसी आरक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून लोधी समाजाचा केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी केली. पूर्व विदर्भातील मामा तलावांसाठी केंद्राचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, ज्यामुळे मामा तलावांची दुरूस्ती, खोलीकरण होऊन स्ंिंचनाच्या सुविधा निर्माण होतील. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेदरम्यान वाहणाऱ्या वाघ नदीवर इस्टर्न वाघ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही राज्यांना शेती सिंंचनाकरिता लाभ होणार असल्याने या प्रकल्पाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश होता.यावेळी उमा भारती यांनी, लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ठ करण्याचे आश्वासन दिले. तसेच बाघ नदीवरील प्रकल्पाकरिता दिल्ली येथील अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश देवून प्रकल्पाला गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री सिंंचन योजनेकरिता २० हजार कोटीचे बजेट असून या माध्यमातून राज्य सरकारला निधी दिला जाणार आहे. प्रकल्पाचे बळकटीकरण व पाण्याच्या लहान स्रोतांच्या विकासाकरिता सरकार कटिबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत आपल्या क्षेत्रात भरीव कामे केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, निखारे, अग्रवाल यांच्याशी चर्चा करून जलसंधारणाची माहिती घेऊन त्यांना उपाययोजनांबाबत निर्देश दिले. यावेळी जयंत शुक्ला, भाऊराव उके, प्रदीपसिंंग ठाकूर, लक्ष्मण चुटे, राजीव ठकरेले, संजय मुरकुटे, अमित झा, सुनील केलनका, पंकज सोनवाने, अहमद मनियार, आत्माराम दसरे, रोहीत दादरीवाल, अजित मेश्राम, रामू लिल्हारे, संजय नागपुरे, उमेश बंबारे, कमलकिशोर लिल्हारे, सुरेश लिल्हारे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे, या अर्धा तासाच्या दौऱ्यादरम्यान भारती यांनी भाजपा, लोधी समाज संघटना व जलसंधारण अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. (प्रतिनिधी)