शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या घरात पोहोचला सौरऊर्जेचा प्रकाश

By admin | Updated: June 19, 2014 23:54 IST

महाराष्ट्राच्या अतिपूर्वेस वसलेला गोंदिया जिल्हा जंगलव्याप्त, वनसंपदेने परिपूर्ण परंतु शैक्षणिक विकासाच्या वाटेपासून दुरावलेला आहे. येथे वास्तव्यास असणारा आदिवासी समाज असंख्य समस्यांनी ग्रासलेला

गोंदिया : महाराष्ट्राच्या अतिपूर्वेस वसलेला गोंदिया जिल्हा जंगलव्याप्त, वनसंपदेने परिपूर्ण परंतु शैक्षणिक विकासाच्या वाटेपासून दुरावलेला आहे. येथे वास्तव्यास असणारा आदिवासी समाज असंख्य समस्यांनी ग्रासलेला असून शैक्षणिक विकास न झाल्यामुळे हा आदिवासी समाज नेहमीच दुर्लक्षीत राहिला आहे. आदिवासींच्या सर्वांगिण विकासाकरिता शासन स्तरावरही बऱ्याच विकासात्मक योजना राबविल्या जातात. त्या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांनी घेणे सुरू केले आहे. परंतु त्यांच्या समस्या अद्यापही पूर्णपणे सुटलेल्या नाहीत.
समाजाच्या मुख्य प्रवाह व सर्वांगिण विकासापासून दूर असलेला आदिवासी समाज आपले जीवन अंधारात जगत आहे. बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव व बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या घरात अद्याप वीज पोहोचली नाही. विकासापासून वंचित राहिलेल्या आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांपैकी एक म्हणजे जिल्हा परिषदेच्या बालकल्याण विभागाकडून सौर कंदीलाचे वाटप कार्यक्रम होय.
व्यवसाय व शिक्षणापासून दूर राहिल्यामुळे व घरात नेहमीच दारिद्र्याची परिस्थिती असल्यामुळे पाच वर्षापूर्वी जिल्ह्यातील शेकडो आदिवासी विद्युत बिलाचा भरणा करु शकले नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. तेव्हापासून त्या कुटुंबियांच्या घरात अंधार पसरलेला होता.
आदिवासींची ही व्यथा शासनाने सौरऊर्जेेवर चालणारे सौर कंदीलाचे वाटप करून सोडविली. जिल्ह्यातील ३२४ कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार ६७५ रुपये किंमतीचे सौर कंदील वाटप करण्यात आले.
याकरिता आठ लाख ६६ हजार ७०० रुपयांचा निधी मंजूर झाला. यात गोंदिया तालुक्यातील ४३, तिरोडा ४४, आमगाव ५९, गोरेगाव ५२, सालेकसा २९, सडक/अर्जुनी २६, अर्जुनी/मोरगाव ३५, देवरी ३६ अशा एकूण ३२४ कुटुंबियांना सौरकंदीलाचे वाटप करण्यात आले.
घरात विजेची सोय नसल्यामुळे अनेक आदिवासी विद्यार्थ्यांपुढे अभ्यासाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत होते. परंतु आता सौर कंदीलाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नवा आधार मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)