शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी रस्त्याअभावी जगताहेत हलाखीचे जीवन

By admin | Updated: September 21, 2014 23:53 IST

सडक/अर्जनी तालुक्यातील सलंगटोल्याचे आदिवासी स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही रस्त्याअभावी हलाकीचे जीवन जगत आहेत. त्यांना गावाबाहेर जाण्यासाठी हक्काचा मार्ग नसल्यामुळे आजही

वामन लांजेवार - शेंडा/कोयलारीसडक/अर्जनी तालुक्यातील सलंगटोल्याचे आदिवासी स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही रस्त्याअभावी हलाकीचे जीवन जगत आहेत. त्यांना गावाबाहेर जाण्यासाठी हक्काचा मार्ग नसल्यामुळे आजही ते विकासापासून कोसो दूर आहेत.सलंगटोला हे गाव दल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असून त्या गावात शंभर टक्के आदिवासी समाजाचे लोक पिढ्यानपिढ्यापासून वास्तव्यास आहेत. परंतु आजही त्या गावात जाण्याकरिता रस्ता नसल्याने तलावाच्या पाळीने किंवा शेतातील धुऱ्याने जावे लागते, हे वास्तव आहे. पावसाळ्यात तर घराबाहेर निघण्यासाठी त्यांना दहावेळा विचार करूनच निघावे लागते. सडक/अर्जुनी तालुक्यातील प्रत्येक गावाला व टोल्यांना डांबरीकरण मार्गाने जोडले आहे. त्यामध्ये सलंगटोला अपवाद आहे. यावर्षी तापाच्या साथीचे थैमान मांडले. या गावातील रूग्णांना औषधोपचारासाठी चारचाकी वाहनाने इतरत्र हलवायचे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. रूग्णाला खाटेवर मांडून दल्ली किंवा लेंडीटोला या गावापर्यंत प्रथम आणावे लागते. त्यानंतरच इतरत्र हलवावे लागते.त्या गावातील लहान चिमुकल्यांना शेतातील धुऱ्याने दल्ली येथे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी ने-आण करावी लागते. पावसाळ्यात गवताचे प्रमाण अधिक असल्याने साप, विंचू किंवा जमिनीवर इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका नाकारता येत नाही. माध्यमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी उशिखेडा, शेंडा आणि डोंगरगाव (डेपो) येथे जातात. परंतु पावसाळ्यात रस्त्याअभावी बुटी मारतात. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. रेशनचे धान्य आणण्याकरिता दल्ली येथे जावे लागते. परंतु पावसाळ्यात सायकलने जाणे कठिण असल्यामुळे डोक्यावर ओझे वाहून आणावे लागते. अशातच धुऱ्यावरून पाय घसरला तर धान्य बांध्यात सांडण्याचीच भीती अधिक असते. सडक/अर्जुनी तालुक्याच्या नकाशातून सलंगटोला हे नाव काढण्यात आले असेल, असे उद्गार एका तरूणाने काढले. निवडणूक काळात आम्ही तुम्हाला जाण्या-येण्यासाठी हक्काचा रस्ता तयार करून देवू, असे सर्वच पक्षाचे उमेवार सांगतात. परंतु निवडणूक संपली की विजयी उमेदवार त्या गावाकडे फिरकतही नसल्याचे सांगण्यात आले. दल्ली ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत आम्ही प्रामुख्याने रस्त्याचा विषय मांडतो. परंतु आजपावेतो त्याची दखल घेण्यात आली नाही, असे अनेक युवकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सलंगटोला गावाच्या रस्त्याची समस्या अनेकदा उजेडात आली. परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. तसेच लोकप्रतिनिधींनीसुद्धा या समस्येवर तोडगा काढला नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपैयी यांच्या काळात पंतप्रधान ग्राम सडक योजना राबविण्यात आली होती. ही योजना अत्यंत लाभदायक असल्यामुळे तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात अविरत सुरू राहिली. तरीही प्रशासनाच्या कामचुकार प्रवृत्तीमुळे सलंगटोल्याचे आदिवासी रस्त्याअभावी मरणयातना भोगत आहेत. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दरवर्षी करोडो रूपये खर्च करते. परंतु प्रशासकीय अधिकारी आपल्या हट्टी प्रवृत्तीने त्याला तडा देण्याचा मार्ग अवलंबतात. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला आदेश देवून सलंगटोला या आदिवासी गावाच्या रस्त्याची समस्या दूर करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.