शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील पवनकांदे परराज्यात

By admin | Updated: May 4, 2015 01:45 IST

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावातील पवनकांदे विक्रीवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू आहे.

संतोष बुकावन  अर्जुनी मोरगावनवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावातील पवनकांदे विक्रीवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू आहे. या पवनकांद्यांना शहरात प्रचंड मागणी असून याची परराज्यात विक्री केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.प्राप्त माहितीनुसार, पवनकांदा ही वनस्पती नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावात मुबलक प्रमाणात आहे. ही वनस्पती राज्यात अत्यंत कमी तलावात दिसून येते. पवनकांदा हे देशी-विदेशी पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. या वनस्पतीच्या आकर्षणामुळे दरवर्षी या तलावात मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी येत असतात. शिवाय वनस्पतीच्या झाडाखाली सावली राहात असल्याने पक्षी उन्हाच्या कडाक्यातून बचावासाठी आश्रय घेतात. पूर्वी या तलावातील पवनकांदे व खस गवताचा लिलाव शासनातर्फे केला जात होता. मात्र पक्ष्यांचे खाद्य कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागातर्फे ५ सप्टेंबर १९८५ रोजी पवनकांदे व खस गवताच्या विक्रीचे लिलाव बंद केले. लिलाव बंद होताच तलाव हे मोकळे रान झाले. यावर नियंत्रण राखण्यात प्रशासनाला अपयश आले. तलावाशेजारी असलेल्या गावातील लोकांना हा अवैध असलेला उद्योग मिळाला. अनेक गावातील लोकांनी या उद्योगाला उदरनिर्वाहाचे साधन बनविले. उन्हाळ्यात तलावाच्या पाण्याची पातळी कमी होते ही पातळी कमी होताच पाण्यात असलेली ही वनस्पती कोरड्या जमिनीवर असते. या वनस्पतीखाली असलेला कंद म्हणजेच पवनकांदा होय. यासाठी लोक वनस्पती तोडून कंद काढण्यासाठी खोदकाम करतात. यामुळे तलाव परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले दिसून येतात. खड्याच्या काठावरची माती तशीच पडून असते. पावसाळ्यात जंगलातून तलावाकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे तलावात मातीचा थर वाढत जातो. वारंवार दरवर्षी होणाऱ्या या पद्धतीमुळे तलाव आणखीच बुजला आहे. तलाव बुजल्याने येथील पाण्याचा संचय कमी झाला आहे. या तलावाचे पाच गावांना सिंचनासाठी पाणी मिळते. तलाव बुजत चालल्याने सिंचनक्षमतेवरही परिणाम झाल्याचे दिसून येते. अशा प्रकारामुळे वनस्पती नष्ट होत आहे. त्यामुळे देशी-विदेशी पक्ष्यांचे आवागमन कमी झाले आहे. वन्यजीव विभागाचे दुर्लक्ष असल्याने पवनकांदे खोदकामाचे निमित्त सधून पक्ष्यांची शिकार सुद्धा केली जात असल्याचे बोलल्या जात आहे.येलोडी, जांभळी, रामपुरी, रांजीटोला तसेच तलावाच्या शेजारी असलेल्या गावातील सुमारे ५०० ते ६०० लोकं दररोज पवनकांद्याच्या खोदकामात गुंतलेले असतात. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हाच उद्योग सुरू असतो. कुटुंबातील मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सारी मंडळी या व्यवसायात रममाण असते. प्रत्येक व्यक्ती दररोज सुमारे ७०० ते ८०० रुपये कमावतो. यामुळेच परिसरात रोजगार हमी योजना, घरकुल योजना व शेती कामासाठी मजूरवर्ग सापडत नाही.काही कुटुंबातील लोक स्वत:च हा उद्योग करतात तर काही लोक गुत्तेदार बनली आहेत. गुत्तेदार लोक इतरांकडून कमी भावाने हे पवनकांदे खरेदी करतात. त्यांची साठवणूक करुन हा माल चारचाकी वाहनातून पुढे पाठवतात. काही लोक स्वत:च आजूबाजूच्या परिसरात जाऊन स्वत: विक्री करतात. काही गुत्तेदार हे रात्री स्वत:च्या दुचाकीने देवरी येथे जावून विक्री करतात. धाबेपवनीनंतर बोदराई फाटा आहे. या फाट्याजवळून एक कालवा जातो. कालव्याजवळून जाणाऱ्या रस्त्याने ही चोरटी वाहतूक केली जाते. हा रस्ता पुढे धाबेपवनी-चिचगड रस्त्याला मिळतो. याच मार्गाने देवरीकडे प्रयाण केले जाते. पवन कांद्यांची भाजी तयार केली जाते. विशेषत: सिंधी बांधव भाजीसाठी पवनकांद्याची मागणी करतात. स्थानिक लोकं देवरीपर्यंत हा माल सोडून देतात. देवरीत व्यापारी बसलेले असतात हे व्यापारी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव, भिलाई, दुर्ग, गोंदिया, नागपूर, वडसा येथील बाजारपेठेत हा पवनकांदा पाठवितात. त्याठिकाणी या कांद्याला ७० ते ८० रुपये किलोप्रमाणे दर मिळतो. या प्रकारावर प्रतिबंध घालणे काळाची गरज आहे.