शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटीसह जोरदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:01 IST

शहरासह जिल्ह्यातील इतर भागात सोमवारी (दि.२३) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली.त्यानंतर काही वेळात जोरदार गारपीटीला सुरूवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली होती.वादळामुळे काही दुकानांचे छत उडाले तर तब्बल अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. गोंदियासह सालेकसा, आमगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव, तिरोडा, अर्जुनी मोरगाव या तालुक्यात सुध्दा पाऊस व गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देशहरातील रस्त्यांवर साचले पाणी : रबी पिकांचे नुकसान, उघड्यावरील धानाला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरासह जिल्ह्यातील इतर भागात सोमवारी (दि.२३) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली.त्यानंतर काही वेळात जोरदार गारपीटीला सुरूवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली होती.वादळामुळे काही दुकानांचे छत उडाले तर तब्बल अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. गोंदियासह सालेकसा, आमगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव, तिरोडा, अर्जुनी मोरगाव या तालुक्यात सुध्दा पाऊस व गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात सोमवारपासून तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वादळी वाºयासह पावसाला सुरूवात झाली. काही क्षणातच गारपीट सुरूवात झाली. जवळपास अर्धा तास पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. तर गारपीटीमुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली होती. सडक अर्जुनी तालुक्यात सुध्दा पाऊस व गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे गहू, हरभरा या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. आमगाव, गोरेगाव, सालेकसा आणि तिरोडा या परिसरात सुध्दा सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गारपीट आणि पावसाला सुरूवात झाली. या भागात जवळपास अर्धा तास पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसामुळे तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द, धापेवाडा या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.वृत्त लिहीपर्यंत भागातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता.गारपीटीमुळे कौलारुंच्या घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. यंदा रब्बी हंगामात १५ हजार हेक्टरवर गहू, हरभरा या पिकांची लागवड करण्यात आली असून गारपीट आणि पावसाचा सर्वाधिक फटका या दोन पिकांना बसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पुन्हा दोन दिवस पावसाचा इशाराहवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस पुन्हा वादळी वाºयासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे रब्बी उत्पादक शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.केंद्रावरील धान भिजलेसध्या जिल्ह्यात खरीप हंगामातील धान खरेदी सुरू आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर जवळपास पाच लाख क्विंटल धान उघड्यावर पडला असून सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान खरेदी केंद्रावरील धान भिजल्याची माहिती आहे.नगर परिषदेची पोलखोलसोमवारी सायंकाळच्या सुमारास शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नाल्या चोक होऊन रस्त्यांवरुन पाणी वाहत होते. यामुळे नगर परिषदेच्या कारभाराची सुध्दा पोलखोल झाली.

टॅग्स :Rainपाऊस