शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खर्च करूनही आरोग्य विभाग आजारी

By admin | Updated: June 22, 2014 00:03 IST

देवरी, सालेकसा, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या तालुक्यात पावसाळ्यात साथीचे रोग अक्षरश: थैमान घालतात. त्यावर अंकुश लावण्यात आरोग्य आणि जिल्हा हिवताप कार्यालयाच्या नाकीनऊ येते.

गोंदिया : देवरी, सालेकसा, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या तालुक्यात पावसाळ्यात साथीचे रोग अक्षरश: थैमान घालतात. त्यावर अंकुश लावण्यात आरोग्य आणि जिल्हा हिवताप कार्यालयाच्या नाकीनऊ येते. एकीकडे कोट्यवधी रुपये खचून आरोग्य सेवा पुरविण्याचा ढोल पिटणाऱ्या या विभागाने रिक्तपदांमुळे मान खाली घातली. हा विभाग स्वत:च आजारी आहे.
जिल्हा हिवताप विभागात मंजूर नियमित ९८ पैकी तब्बल ५७ कंत्राटी आरोग्यसेवकांना मानधन देण्याकरिता निधी नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. आरोग्य विभाग पुन्हा किती जणांचा जीव घेणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु केला. उपकेंद्र ते जिल्हा परिषद आणि जिल्हा सामान्य रुग्णालय ते जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, सर्वांनाच कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्याची मोकळीक दिली. मात्र, हा निधी फक्त खरेदी आणि बांधकामावरच जास्त खर्च झाला. प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिकांना अद्याप खासगी डॉक्टरांवरच अवलंबून राहावे लागत आहे. देवरी, अर्जुनी मोरगाव, सालेकसा तालुक्यांतील जंगलव्याप्त भागात रुग्णालये आहेत. मात्र, वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे अप्रशिक्षित खसगी डॉक्टरांचे पीक आले. चालू आर्थिक वर्षात तीन महिन्यांत चौघांचा हिवतापाने बळी गेला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विहीरगाव, केशोरी आदी गावांतील नागरिकांना हिवताप आणि डेंग्यूची लागण झाली. गतवर्षी पावसाळ्यात अनेक गावांना साथीच्या आजाराने थैमान घातले होते. मात्र, वेळीच जागेल तो आरोग्य विभाग कसला. राज्य शासनातर्फे या विभगाला फवारणी, साथरोग नियंत्रण, रक्त नमुने तपासणी आदी कामांची जबाबदारी देण्यात आली. परंतु मुख्यत्वे गावस्तरावर काम करणाऱ्या आरोग्यसेवकांचीच पदे गेल्या कित्येक वर्षापासून रिक्त असल्यामुळे विभागाला दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता होऊ शकत नाही. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाला नियमित आरोग्यसेवकांची ९८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी तब्बल ५७ पदे अद्याप रिक्त आहेत. त्याचबरोबर १६ कंत्राटी आरोग्यसेवकांची पदे मंजूर आहेत. ३१ मार्चपासून निधी नसल्याचे कारण सांगून ती पदे अद्याप भरली नाही.