शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगाव तालुक्यात गावरस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

By admin | Updated: June 21, 2014 01:47 IST

तालुक्यातील ९९ गावांमधील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.

गोरेगाव : तालुक्यातील ९९ गावांमधील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. मात्र तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींकडे अतिक्रमण हटाव समित्याच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात ग्रामविकास खात्याचा स्वतंत्र आदेश आहे. मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला या आदेशाचा विसर पडला आहे.
गावातील खुल्या किंवा शासकीय जागेवर गावकऱ्यांनी अतिक्रमण करू नये यावर नजर ठेवण्यासाठी ग्रामविकास खात्याच्या स्वतंत्र विभागाने ग्रामपंचायत प्रशासनाला ‘अतिक्रमण हटाव समिती’ गठित करण्याचे आदेश दिले आहे. पण सदर आदेशाची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल न घेतल्याने गावातील मुख्य रस्ते, जोडरस्ते, शासकीय जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहेत.
ग्रामविकास खात्याच्या स्वतंत्र विभागाने प्रत्येक गावात ग्रामसभेत अतिक्रमण हटाव समिती स्थापन करण्याचे आदेश सर्व पंचायत समितीतर्फे ग्रामपंचायतींना दिले होते. या समितीमध्ये सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते, वकील यांचा समावेश करण्याचे आदेशात म्हटले होते. गावात ज्यांनी अतिक्रमण केले त्यांना प्रथम सूचना करणे, नोटीस बजावणे, त्यानंतरही अतिक्रमण न काढल्यास पोलीस ठाण्याला माहिती देवून तालुका प्रशासनाच्या पुढाकाराने ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचे आदेशात नमूद आहे. मात्र या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यामुळे अतिक्रमण करणारे शिरजोर झाले आहेत. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला तेथील नागरिक जुमानत नसल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे.
तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या अधिनस्थ ९९ गावे येतात. या गावातील रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहेत. चारचाकी वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकांनी रस्त्यालगत काटेरी कुंपन केल्याने अनेकांचे अपघात झाले आहे. हा सर्व अतिक्रमणाचा प्रकार राजरोष सुरू असून याविरोधात आवाज उचलणारे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य ‘व्होटबँक’ कमी होईल या भितीने शांत आहेत.
या गावागावातील वाढत्या अतिक्रमणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून यावर वेळीच कारवाई झाली नाही तर भविष्यात रस्ताच शोधण्याची वेळ प्रशासनाला येईल. भविष्याचा विचार करून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी सुज्ज्ञ नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)