शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
7
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
8
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
9
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
10
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
11
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
12
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
13
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
14
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
15
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
16
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
17
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
18
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी गणवेश नाहीच

By admin | Updated: June 25, 2014 23:48 IST

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाची योजना यंदा मात्र फसली आहे. विभागाने मागणी केलेला तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांचा निधीच न आल्याने आज शाळेच्या पहिल्या

९१ हजार ८११ विद्यार्थी राहणार वंचित : ३.२६ कोटी मिळालेच नाही
कपिल केकत - गोंदिया
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाची योजना यंदा मात्र फसली आहे. विभागाने मागणी केलेला तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांचा निधीच न आल्याने आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करता येणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९१ हजार ८११ विद्यार्थी गणवेशापासून वंचीत राहणार आहेत.
शिक्षणापासून कुणीही वंचीत राहू नये यासाठी शासनाकडून विद्यार्थी व पालकांना आकर्षीत करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षीत करण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले जात असून त्यात एक म्हणजे विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक वाटपाचा कार्यक्रम आहे. मात्र प्रशासनाच्या लेटलतीफ कार्यप्रणालीमुळे हे कार्यक्रमचं आता फसू लागल्याची स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. यातील पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम यंदा यशस्वी ठरणार. मात्र शाळेच्या पहिल्या विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करण्याचा कार्यक्रम यंदा फसल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळेत (जिल्हा परिषद व नगर परिषद) वर्ग १ ते ८ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली तसेच एससी, एसटी व बीपीएल अंतर्गत येत असलेल्या परिवारातील मुलांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत दोन जोड गणवेश दिले जातात. शालेच्या पहिल्या दिवशी या विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करण्याची तशी विशेष योजनाच शासनाकडून राबविली जात आहे.
यासाठी शाळा व्यवस्थापन समिती गणवेश तयार करून विद्यार्थ्यांना वितरीत करते. पाठ्यपुस्तक व गणवेश मिळाल्यास विद्यार्थ्यांत शाळा व शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांचा कल शाळेकडे वाढणार असा या मागचा उद्देश आहे.
जिल्ह्यात यावर्षी ९१ हजार ८११ विद्यार्थी या योजनेस पात्र ठरत आहेत. यातील ७१ हजार ३१७ विद्यार्थ्यांना गणवेशासाठी ४०० रूपये दराने गणवेश द्यावयाचे आहेत. तर २० हजार ४९४ विदयार्थी राज्य शासनाच्या १०३ विकास गट योजनेंतर्गत येत असल्याने त्यांना राज्य शासनाकडून एक जोड गणवेश दिले जातात. तर या विद्यार्थ्यांना दुसरा जोड सर्व शिक्षा अभियांनांतर्गत दिला जाणार असल्याने त्यांना गणवेशासाठी २०० रूपये लागणार आहेत.
त्यानुसार, संबंधित विभागाने शासनाकडे तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांची मागणी केली होती. मात्र शासनाकडून अद्याप मागण्यात आलेला निधी देण्यात आलेला नाही. परिणामी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करायचे कसे हा प्रश्न विभागापुढे उभा आहे.
त्यातही शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटपाची योजना यशस्वी करण्या संदर्भात आदेश देऊन टाकले आहेत. मात्र पैसे न दिल्याने मुख्याध्यापकांची फसगत झाली आहे.
शाळेतील एवढ्या विद्यार्थ्यांचे गणवेश आता त्यांना आपल्याकडून पैसे फसवून बनवावे लागणार आहे. तर शिक्षकांचे मागील दोन महिन्यांपासून पगार न झाल्याने त्यांचीही स्थिती बिकट असून त्यात गणवेशाचा बोझा उचलण्यास स्पष्ट नकार दिसून येत आहे.
एकंदर यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटपाची योजना फसली असून विद्यार्थी गणवेशापासून वंचीत राहणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यातही हा प्रकार लगतच्या अन्य जिल्ह्यांतही असल्याने अवघ्या राज्यातच गणवेश काही वाटले जाणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.