शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

जिल्ह्यात आठ शेतकरी आत्महत्या : चार जणांच्या कुटुंबीयांना वर्षभरापासून मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मागील २१ वर्षांच्या कालावधीत एकूण २७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यापैकी केवळ १४५ शेतकऱ्यांना प्रशासनाने मदतीस पात्र ठरवित त्यांना प्रती १ लाख रुपयांची मदत दिली आहे. तब्बल १२२ प्रकरणे कुठल्या आधारावर अपात्र ठरविली याचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट केले नाही. पाच प्रकरणे अद्यापही चौकशीच्या फेऱ्यातच अडकली आहेत. घरातील प्रमुख पुरुषाचा अकाली मृत्यू झाल्याने त्या शेतकरी कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्दे२१ वर्षात शेतकरी आत्महत्येची १२२ प्रकरणे अपात्र : शेतकरी कुटुंबाची मदतीअभावी होतेय होरपळ

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सततची नापिकी, दुष्काळ, नैसर्गिक संकटे, कर्ज फेडीची चिंता यातून आलेल्या नैराश्यातून मागील वर्षी जिल्ह्यातील ८ शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्यांची नोंद सरकार दरबारी सुद्धा झाली. पण १ लाख रुपयांची आर्थिक मदत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यासाठी वेगवेगळे निकष लावून त्यांना मदतीपासून वंचित ठेवले जात आहे. मागील वर्षी आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून यापैकी केवळ चार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली तर तीन प्रकरणे अपात्र ठरविली तर एक प्रकरण वर्षभरापासून चौकशीतच आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यात मागील २१ वर्षांच्या कालावधीत एकूण २७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यापैकी केवळ १४५ शेतकऱ्यांना प्रशासनाने मदतीस पात्र ठरवित त्यांना प्रती १ लाख रुपयांची मदत दिली आहे. तब्बल १२२ प्रकरणे कुठल्या आधारावर अपात्र ठरविली याचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट केले नाही. पाच प्रकरणे अद्यापही चौकशीच्या फेऱ्यातच अडकली आहेत. घरातील प्रमुख पुरुषाचा अकाली मृत्यू झाल्याने त्या शेतकरी कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. अशात शासनाकडून किमान आर्थिक मदत तरी मिळेल अशी भोळी आशा या शेतकरी कुटुंबीयांना होती. मात्र त्या आशेवर सुद्धा प्रशासकीय दप्तर दिरंगाईने पाणी फेरले आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची वाताहत झाली असून त्यांना रोजी रोटी व चार घरची धुणी भांडी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. मात्र दगडाचे मन असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला अद्यापही पाझर फुटलेला नाही.  

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रतिक्रिया

पती भारत यांनी अर्धा एकर शेतीवर कर्ज घेतले होते व बचत गट आणि खासगी सुद्धा कर्ज घेतले होते. यातूनच आलेल्या नैराश्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. याची चौकशी सुद्धा झाली. शासनाकडून मदत मिळावी यासाठी फाईल तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली पण अद्यापही आर्थिक मदत मिळाली नाही. तीन मुली आणि एक मुलगा असून मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. घरकूल बांधकामाचे पैसे न मिळाल्याने बांधकाम सुद्धा ठप्प पडले आहे. - यशोदा भारत सयाम, महागाव

सततची नापिकी आणि कर्ज फेडण्याची चिंता यातून आलेल्या नैराश्यापोटी पतीने आत्महत्या केली. त्यामुळे कुटुंबाचा आधारच हिरावला. यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यासाठी मोलमजुरी करुन कसेबसे कुटुंब चालवित आहे. पण शासनाकडून अद्यापही कुठलीच आर्थिक मदत मिळाली नाही. - सुगंधा मानकर , देवरी.

शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची होत असलेली वाताहत लक्षात घेऊन त्यांना त्वरित आर्थिक मदत करण्याची गरज आहे. पण मागील वर्षभरापासून दप्तर दिरंगाईमुळे अद्यापही आम्हाला कुठलीच आर्थिक मदत मिळाली नसल्याने विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. - पुणेशा नाकाडे , ताडगाव.

मदतीसाठी शेतकरी कुटुंबीयांची फरपट शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीतून निघणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून असतो. अशातच घरातील प्रमुख व्यक्तीचा मृृत्यू झाल्यास त्या कुटुंबाची कशी वाताहत होते हे केवळ त्यांचे कुटुंबीय जाणतात. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाकडून १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पण ही मदत मिळण्यासाठी कागदपत्रांची लांबलचक फाईल तयार करावी लागते. ती तयार केल्यानंतरही मदत मिळतेच असे नाही. आर्थिक मदत मिळण्यासाठी १४५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची अद्यापही शासन दरबारी फरपट सुरू आहे. शेतकरी आत्महत्येची प्रकरणे नेमकी कुठल्या आधारावर अपात्र ठरविली जात आहेत. हे कळण्यास मात्र अद्यापही मार्ग नाही. 

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या