शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सिंचनक्षेत्रात यावर्षी होणार घट

By admin | Updated: November 27, 2014 23:35 IST

बाघ-ईटियाडोह पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यावर्षी रबी-उन्हाळी पिकांसाठी मिळणाऱ्या पाण्यात घट होणार आहे. यावर्षी कमी पावसामुळे धरणात पुरेशा प्रमाणात जलसाठा नाही.

अपुरा पाणीसाठा : गतवर्षीपेक्षा चार हजार हेक्टर कमी सिंचनाचे नियोजन
गोंदिया : बाघ-ईटियाडोह पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यावर्षी रबी-उन्हाळी पिकांसाठी मिळणाऱ्या पाण्यात घट होणार आहे. यावर्षी कमी पावसामुळे धरणात पुरेशा प्रमाणात जलसाठा नाही. त्यामुळे अवघ्या लाभक्षेत्रातील तीन जिल्ह्यांमिळून ७९०० हेक्टर क्षेत्रातच उन्हाळी हंगामाचे पिकाच्या लागवडीचे नियोजन प्रस्तावित करण्यात आले आहे.
ईटियाडोह प्रकल्पाचे पाणी गोंदियासह भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांनाही मिळते. यावर्षी प्रस्तावित नियोजनात गोंदिया जिल्ह्याला प्रस्तावित जलसाठ्याच्या ३५ टक्के पाणी मिळणार आहे. त्यातून २७६५ हेक्टरमध्ये सिंचन होणार आहे. भंडारा जिल्ह्याला २५ टक्के पाणी मिळणार असून त्यातून १९७५ हेक्टर सिंचन होणार आहे. तर गडचिरोली जिल्ह्याला सर्वाधिक ४० टक्के पाणी मिळणार असून त्यातून त्या जिल्ह्यातील ३१६० हेक्टर शेतीचे सिंचन होणार आहे.
ईटियाडोह प्रकल्पस्तरिय, वितरिकास्तरिय व पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत उपविभाग अर्जुनी मोरगाव व वडसा यांच्या अधिकाऱ्यांची बैठक कार्यकारी अभियंता वसंत गोन्नाडे यांच्या उपस्थितीत वडसा येथे झाली. त्यात रबी-उन्हाळी हंगाम २०१४-१५ चे नियोजन करण्यात आले. त्यानुसार अर्जुनी मोरगाव उपविभागातील पाणी वापर संस्थांना ४७०० हेक्टर क्षेत्राकरिता तर वडसा उपविभागातील पाणी वापर संस्थांना ३२०० हेक्टर क्षेत्राकरिता उन्हाळी पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी १२ हजार हेक्टरला सिंचनाचे नियोजन बाघ-ईटियाडोह विभागाने केले होते. प्रत्यक्षात त्यापेक्षाही जास्त सिंचन झाले होते. त्या तुलनेत यावर्षी केवळ ७९०० हेक्टर सिंचनाचे नियोजन करता आले. याबाबत सांगताना कार्यकारी अभियंता गोन्नाडे यांनी म्हणाले, यावर्षी खरिप हंगामात पाऊस कमी पडल्यामुळे पिकांसाठी ३ ते ४ पाळ्या पाणी देण्यात आले. आधीच जलसाठा कमी असताना खरिपातही पाणी वापर झाल्यामुळे रबी-उन्हाळीसाठी कमी नियोजन करावे लागत असल्याचे ते म्हणाले. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे पाण्याचा सदुपयोग होण्यासाठी पाटचाऱ्या सुस्थितीत व प्रवाहक्षम करून ठेवाव्यात तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करून अपव्यय टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)