शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

जिल्हाधिकारी कार्यालयाला लागले रिक्तपदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 5:00 AM

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नंतर अत्यंत महत्वाचे पद म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी आहे. कर्मचारी व जिल्हाधिकारी यांच्यातील महत्वाचा दुवा असून इतर विभागासमवेत समन्वय साधण्याची जबाबदारी या पदाकडे आहे. परंतु हे पद जानेवारी २०२० पासून रिक्त आहे. या पदाचा कार्यभार अतिरीक्त स्वरुपात इतर अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) हे पद सर्वसामान्य जनतेच्या रोजगाराशी सबंधीत असून गेल्या वर्षभरापासून पद रिक्त आहे.

ठळक मुद्देशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : जनतेने न्याय मागावा कुणाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा हा नक्षलग्रस्त असून नागपूर विभागातील व विदर्भातील शेवटचा जिल्हा आहे. जिल्हा प्रशासनातील अत्यंत महत्वाचा विभाग म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय आहे. सर्व सामान्य जनता कोणत्याही प्रश्नाबाबत, शेती विषयक कामे व इतर अन्य स्वरुपाच्या तक्रारीबाबत जिल्हा प्रशासनाकडे दाद मागण्याकरिता जातात. अशा परिस्थितीत जर अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असेल तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागावा हा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु याकडे जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी व शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नंतर अत्यंत महत्वाचे पद म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी आहे. कर्मचारी व जिल्हाधिकारी यांच्यातील महत्वाचा दुवा असून इतर विभागासमवेत समन्वय साधण्याची जबाबदारी या पदाकडे आहे. परंतु हे पद जानेवारी २०२० पासून रिक्त आहे. या पदाचा कार्यभार अतिरीक्त स्वरुपात इतर अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) हे पद सर्वसामान्य जनतेच्या रोजगाराशी सबंधीत असून गेल्या वर्षभरापासून पद रिक्त आहे. त्याचप्रमाणे सर्वात मोठा विभाग म्हणजे गोंदिया उपविभाग परंतु येथील पद सुध्दा रिक्त असून अतिरीक्त स्वरुपात अपर तहसीलदारांना कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या कामांना व कोरोनासारख्या महामारीबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजनेत कुचराई होत असल्याचे दिसून येत आहे.उपविभाग अधिकारी (तिरोडा) हे पद सुमारे २ महिन्यांपासून रिक्त आहे. जिल्ह्यातील इतर पदाची परिस्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, लिपीक संवर्ग, शिपाई, कोतवाल व पोलीस पाटील इत्यादी सर्व पदे रिक्त असून अतिरीक्त स्वरुपात इतर कर्मचाऱ्यांकडे कार्यभार असल्याचे दिसून येते.एकंदरीत जिल्ह्याचा विचार केला तर अधिकारी गोंदिया जिल्ह्यात येण्यास तयार होत नाही व आले तर विहित मुदतीच्या आत आपली सोईच्या ठिकाणी बदली करुन घेतात असे दिसून येते. तर शासनही रिक्त असलेली पदे भरण्याकरीता सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचेही दिसून येते. तसेच जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी याबाबत एक बोलण्यास किंवा शासनाकडे पाठपुरावा करण्यास कमी पडत असल्याचे दिसते. त्यामुळे सामान्य जनतेनी कोणाकडे न्याय मागावा असा प्रश्न जिल्ह्याला पडला आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी