शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता हीच आरोग्याची संजीवनी

By admin | Updated: January 1, 2015 23:03 IST

आरोग्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. परिसरातील अस्वच्छतेमुळे समाजात नवनवीन आजारांची लागण होते. आजाराचे मूळ कारण अस्वच्छता आहे.

अरविंद शिवणकर : स्वच्छ ग्राम मेळावाबोंडगावदेवी : आरोग्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. परिसरातील अस्वच्छतेमुळे समाजात नवनवीन आजारांची लागण होते. आजाराचे मूळ कारण अस्वच्छता आहे. गावात आरोग्य सुदृढ नांदून रोगांचा नायनाट करण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून घराशेजारील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे यावे. स्वच्छता ही आरोग्याची संजीवनी आहे, असे मत जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती अर्जुनी/मोरगावच्या वतीने पिंपळगाव येथील ग्रामपंचायतमध्ये ग्राम स्वच्छता मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पं.स. चे उपसभापती पोमेश्वर रामटेके, पं.स. सदस्य अल्का बांबोळे, सरपंच, खंडविकास अधिकारी जी.डी. कोरडे, सहायक खंड विकास अधिकारी सुनील तडस मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांनी आपल्या बोंडगावदेवी जि.प. प्रभागातून पिंपळगाव दत्तक घेतले आहे. याप्रसंगी उपस्थितांना स्वच्छ भारत अभियान मेळाव्यासंदर्भात आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले की, प्रत्येकाने स्वत:च्या घरासमोर स्वच्छता केली तर रस्त्यावर घाण-कचरा राहणार नाही. एक सामाजिक बांधिलकी समजून ग्रामस्थांनी आपले गाव स्वच्छ ठेवण्याचे मानस अंगिकारावे. गावात स्वच्छतेचे दृश्य निर्माण झाल्यास निश्चितच गाव समृध्द होऊन विकासाच्या वाटेवर जाण्यास वेळ लागणार नाही, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. बोंडगावदेवी जि.प. प्रभागातून जिल्हा परिषदेच्या स्वच्छ ग्राम योजनेंतर्गत पिंपळगाव संपूर्ण स्वच्छ करण्याकरिता दत्तक घेत असल्याचे शिवणकर यांनी सांगितले. स्वच्छ भारत मिशनमध्ये गावकऱ्यांनी गाव स्वच्छतेचा संकल्प करण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. मेळाव्याचे संचालन पं.स. चे विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) राजू वलथरे यांनी केले. मेळाव्याला पंचायत समिती स्तरावरील अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)