शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतविरूद्ध नागरिक

By admin | Updated: December 31, 2015 01:51 IST

स्थानिक ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांनी मासिक सभेचे अवलोकन करण्यासाठी मासिक सभेत ...

नवेगावबांध : स्थानिक ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांनी मासिक सभेचे अवलोकन करण्यासाठी मासिक सभेत उपस्थित राहण्याची परवानगी मिळविण्यासाठी मागील दोन महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर केलेत. परंतु एकूण सतरा सदस्यांपैकी अकरा सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे नागरिकविरूध्द ग्रामपंचायत सदस्य, असे शीतयुध्द नवेगावबांध येथे सुरू असल्याचे बोलले जात आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १५/१ अन्वये ग्रामपंचायतच्या मासिक सभेचे कामकाज लोकाभिमुख व पारदर्शक व्हावे यासाठी मासिक सभेचे अवलोकन करण्यासाठी अर्ज करणाऱ्या स्थानिक नागरिकांना परवानगी देण्यात यावी, असे नमूद आहे. तसेच नियम ६/२ अन्वये ग्रामपंचायतची सभा ग्रामपंचायत कार्यालय, सभागृह किंवा चावडीतसुध्दा भरविण्यात आली पाहिजे, असेही नमूद आहे. मासिक सभेच्या अवलोकनार्थ काही नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात मागील दोन महिन्यापूर्वी अर्ज सादर केले. त्यासोबतच अधिनियमाची झेरॉक्स प्रतदेखील जोडण्यात आली. परंतु अकरा सदस्यांनी या अर्जावर आक्षेप घेतला. हे आपल्या अधिकारावर अतिक्रमण असल्याचे सांगून २१ डिसेंबरच्या मासिक सभेतून काढता पाय घेतला. सदर अधिनियमाची ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी माहिती देऊनसुध्दा हे सदस्य मानायलाच तयार नाहीत. उलट सरपंचावर अविश्वास आणण्याची धमकी देत असल्याचे वृत्त आहे. मासिक सभेमध्ये नागरिकांच्या विविध कामांना मंजुरी देणे, नाहरकत प्रमाणपत्र, संपत्तीचे फेरफार, घर टॅक्स लावणे, विकास कामांचे नियोजन, आरोग्याशी निगडीत असलेले ठराव आदी कामे मंजूर करण्यात येतात. परंतु सभेत काही मोजक्या लोकांचीच कामे केली जातात व इतरांची अकारण अडवणूक केली जाते, असा नागरिकांचा आक्षेप आहे. यासाठी नागरिकांनी अधिनियमाचे शस्त्र उगारले. परंतु यामुळे मात्र काही सदस्यांच्या पोटात दुखू लागले आहे. याचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. सदस्यांच्या वशिलेबाजीने कामे होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे सदस्य विरूध्द नागरिक असे शीतयुध्द सुरू झाले आहे. यावर कोणती उपाययोजना केली जाते, याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)