शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षापासून रखडली बिजेपार उपसा सिंचन योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST

बिजेपार परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला सिंचनाची सोय नाही. अनेक वर्षाच्या मागणीनंतर १९९५ मध्ये युती शासनात आमगावचे तत्कालीन आमदार महादेवराव शिवणकर हे पाटबंधारे मंत्री झाले तेव्हा त्यांनी या परिसराला सिंचनाची सोय करुन देण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देवन कायद्यात अडकले कालवे । निधी आला आणि परत गेला

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सिंचन प्रकल्प उपलब्ध असताना सुध्दा शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणारी बिजेपार उपसा सिंचन योजना मागील २५ वर्षापासून रखडली असल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.बिजेपार परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला सिंचनाची सोय नाही. अनेक वर्षाच्या मागणीनंतर १९९५ मध्ये युती शासनात आमगावचे तत्कालीन आमदार महादेवराव शिवणकर हे पाटबंधारे मंत्री झाले तेव्हा त्यांनी या परिसराला सिंचनाची सोय करुन देण्याचे आश्वासन दिले. नियोजनाप्रमाणे या परिसरात काही अंतरावर असलेल्या कालीसरार धरणातून उपसा सिंचन योजना मंजूर करण्याची हमी दिली. यासाठी आधी ९० टक्के आदिवासी शेतकरी असणे गरजेचे होते. ती अट रद्द शिवणकर यांनी ५० टक्के करायला लावून बिजेपार उपसा सिंचन योजनेचा मार्ग मोकळा केला. या योजनेसाठी राज्य शासनाने जवळपास दोन कोटी रुपये खर्च केले आणि पाणी उपसा करण्यासाठी पंप सुद्धा बसविण्यात आले. कालव्याचे काम सुरु झाले पण लगेच वन कायद्यात कालव्याचे काम अडकले. वन कायद्याचा अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न करुन मंजुरी आणण्याचे कामे करण्यात आली.परंतु नंतर यासाठी पुढे लागणारा निधी मिळाला नाही. १९९९ ला राज्यात सरकार बदलले आणि या योजनेकडे सपशेल दुर्लक्ष झाले. शेतकऱ्यांनी या योजनेला पूर्ण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आमदार, खासदारांच्या घरी अनेकदा पायपीट केली तरी सुद्धा ही योजना आतापर्यंत सुरु झाली नाही. शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे २०१२ मध्ये या योजनेसाठी काही निधी संबंधित विभागाला मिळाला परंतु विभागाने योजनेचे काम सुरु केले नाही. शेवटी निधी परत गेला आणि उपसा सिंचन योजना तशीच अर्धवट पडून राहिली. २००५ ते २००९ दरम्यान भेरसिंह नागपुरे हे आमदार असताना त्यांनी या योजनेसाठी प्रयत्न चालविले व मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्य शासनाने निधी मंजूर करुन सुद्धा योजना पूर्णत्वास आली नाही.३०० हेक्टरला सिंचनाची सोयबिजेपार उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यास जवळपास ३०० हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होईल. त्यामुळे सुदूर क्षेत्रात राहणारे गरीब व मागास वर्गाचे शेतकरी आपल्या शेतात भरघोष पीक घेवून आर्थिक स्थिती सुधारु शकतात.गावाजळच कालीसरार धरण असून सुद्धा बिजेपार परिसरातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. बिजेपार उपसा सिंचन योजना पूर्ण करुन शासनाने शेतकऱ्यांचे हित साधण्याची गरज आहे.- चरणदास चंद्रिकापूरे,सामाजिक कार्यकर्ता बिजेपार

टॅग्स :Waterपाणी