शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या दत्तक गावाला सिंचनाची आस

By admin | Updated: December 27, 2014 22:52 IST

गोरेगाव तालुक्यातील अवघ्या ३८०० लोकवस्तीचे पाथरी म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले एक खेडेगाव. शेती आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तेथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे

पटेलांचा पुढाकार : गावकऱ्यांना हवे शेतीला पाणी, हाताला काम अन् घामाला दाम
मनोज ताजने - गोंदिया
गोरेगाव तालुक्यातील अवघ्या ३८०० लोकवस्तीचे पाथरी म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले एक खेडेगाव. शेती आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तेथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे फार मोठे स्वप्न पाहीले नाही. मुलभूत सुविधा मिळाल्या तरी पुरेसे एवढीच या गावातील लोकांची इच्छा होती, पण माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी हे गाव दत्तक घेतले आणि येथील गावकऱ्यांनाही विकासाची स्वप्नं पडू लागली. ‘लोकमत’ने या गावात जाऊन तेथील विविध स्तरातील लोकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विविध अपेक्षा व्यक्त केल्या.
पाथरी गावात सर्वच समाजाचे लोक राहतात. पण गावातील सामाजिक पार्श्वभूमी अतिशय चांगली आहे. त्यांच्यात कधीही धार्मिक, जातीय तेढ निर्माण झालेली नाही. गावातील कोणतेही भांडण-तंटे गावातच मिटविण्याचा येथील प्रघात आहे. बहुतांश लोक शेतीवर उपजीविका करणारे आहेत. पण जवळच असलेल्या कटंगी प्रकल्पात या गावातील १५० ते २०० लोकांची शेतजमीन गेली. त्यामुळे अनेकांना उपजीविकेसाठी गाव सोडून जावे लागले.
कटंगी प्रकल्पासाठी शेतजमिनी देऊनही त्या प्रकल्पाचे पाणी या गावकऱ्यांना मिळू शकत नाही ही येथील गावकऱ्यांची सर्वात मोठी खंत आहे. कारण हे गाव आणि लगतच्या शेतजमिनी उंच आहे तर प्रकल्पाचे स्थळ खालच्या भागाला आहे. त्यामुळे गावात थेट पाणी पोहोचू शकत नाही. मात्र लिफ्ट करून (उपसा सिंचन योजना) प्रकल्पाचे पाणी शेताला द्यावे अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.
शेतीला पाण्याची सोय झाली तर पाथरीतील शेतकरी रबी हंगामातही धानाचे पिक घेऊन संपन्न होतील, अशी त्यांना आशा आहे. प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळत नसेल तर शेतकऱ्यांच्या शेतात शासनाने बोर करून द्यावी अशी अपेक्षा शिवाजी सोनेवाने यांनी व्यक्त केली.
या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात आहे. गावात जलस्वराज्य प्रकल्पातून आधी एक पाण्याची टाकी तयार केली होती. पण ती अपुरी पडत असल्याने ७४ लाख रुपये खर्चुन नवीन टाकी तयार करण्यात आली. मात्र त्या टाकीला साजेशी पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे जुन्याच पाईपलाईनवरून काम भागविले जात आहे. नवीन पाईपलाईन टाकल्यास योग्य प्रमाणात पाणी मिळण्यास मदत होईल, असे माजी उपसरपंच भरत ठाकूर यांनी सांगितले. गावातील काही हातपंप चालू तर काही बंद स्थितीत आहेत. विशेष म्हणजे गावातील काही विहिरी आणि त्यावरील हातपंपाचे पाणी खारे आहे. ते पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्वस्वी नळ योजनेच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.
जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंतच्या वर्गांची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी १ किलोमीटरवर असलेल्या कुऱ्हाडी गावात जावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्रही कुऱ्हाडीत आहे. एक किलोमीटरचे अंतर पार करताना गावकऱ्यांना कोणतीही अडचण नाही.
मात्र गावातील रस्ते, नाल्यांची दुरूस्ती करण्यासाठी बराच वाव आहे. तुटफूट झालेले, उखडलेले रस्ते दुरूस्त केल्यास आणि नाल्यांची योग्य बांधणे करून सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने केल्यास या गावाच्या सौंदर्यात अधिक भर पडेल. प्रफुल्ल पटेलांसारख्या मोठ्या नेत्याने हे गाव दत्तक घेतल्यामुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.