शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन सुशासन करायचेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2016 02:50 IST

जनतेच्या सेवेसाठीच आम्ही खुर्चीवर बसलो आहे. त्यांच्या समस्या व तक्रारींना सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याला

गोंदिया : जनतेच्या सेवेसाठीच आम्ही खुर्चीवर बसलो आहे. त्यांच्या समस्या व तक्रारींना सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याला वेग द्यायचा आहे. त्याशिवाय आमच्यावर असलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडता येणार नाही, यासाठी प्रशासन सुशासन करायचेय असा संकल्प जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य शासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर घेतला. नववर्षाच्या आगमनासोबतच प्रत्येक जण या वर्षात काय नवीन करायचेय आणि काय सोडायचेय याचा संकल्प घेतात. यात आपल्या खाजगी जीवनात अंमल करण्यासह आपल्या कार्यक्षेत्रातही आपल्याला अपेक्षित असे काही संकल्प घेतले जातात. नववर्षाच्या या शुभागमनाच्या शुभमुहूर्तावर ‘लोकमत’ने जनतेचा थेट संबंध येणाऱ्या शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यात त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टींचा संकल्प बोलून दाखविला. (शहर प्रतिनिधी)जनता संतुष्ट व्हायला हवी लोकांच्या तक्रारी सोडविण्याच्या कामात पाहिजे तेवढा वेग आलेला नाही. जनता संतुष्ट होणे गरजचे आहे यासाठी प्रथम प्रशासन सुशासनात बदलायचे आहे. शिवाय कृषी व जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता करवून द्यायची आहे. जिल्हा धानासाठी प्रसिद्ध असला तरिही शेतकरी फक्त धानावरच अवलंबून राहू नये यासाठी शेतकऱ्यांचे गट तयार करून वेगवेगळे पिक घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करायचे आहे. विशेष म्हणजे पर्यटनाला चालना देऊन ‘सारस डेस्टीनेशन’ची स्थापना करायची आहे. -डॉ.विजय सुर्यवंशी जिल्हाधिकारी, गोंदिया महिला सुरक्षेवर भर महिला सुरक्षेचा विषय गांभीर्याने घेतला जाणार आहे. यासाठी समाजात कार्य करणाऱ्या विविध संस्था व संघटनांना सहभागी करून घेऊ. शिवाय समाज व पोलीस विभागात संवाद वाढावा यासाठी विशेष उपाययोजना केली जात असून कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यासाठी जिल्ह्यात सहा हजार १४६ पोलीस मित्र तयार करण्यात आले आहे. पोलीसांकडून सुरू असलेली नियमीत काम तर होणारच. यात अवैध धंद्यावर गय केली जाणार नाही. नागरिकांना सुरक्षा देऊन त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत. -शशिकुमार मीना पोलीस अधीक्षक, गोंदिया पर्यटन विकासावर फोकस जिल्ह्याला जल, जंगल व जीव हे वरदान लाभलेले आहे. मात्र बफर झोनमध्ये असलेल्या क्षेत्रांचा विकास होऊ शकला नाही. या क्षेत्रांचा विकास करावयाचा आहे. यासाठी जिल्ह्यातील पर्यटन विकासावर फोकस असून विविध क्षेत्रांच्या विकासासाठी सुरू केलेल्या कामांना अधिक गती द्यायची आहे. विशेष म्हणजे, लोकसहभागातून वन संरक्षणाला नवे मार्ग देत जिल्ह्यात सर्वाधीक ग्रामवन तयार करायचे आहेत. -डॉ. जितेंद्र रामगावकर उपवनसंरक्षक, वन विभाग विकास कामे मार्गी लावायचीयशहरातील विविध विकासकामे पडून आहेत. ती कामे पूर्ण करायची असून शहर अधिक सुंदर व सुविधायुक्त बनवायचे आहे. कर वसुली हे नगर परिषदेचे मुख्य उत्पन्नाचे मार्ग आहे. त्यामुळे आता कर वसुलीसाठी आता जोर लावणार आहे. शिवाय नगर परिषदेचे कामकाज सुरळीत करून शहरवासीयांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जाणार. विशेष म्हणजे, शहरातील अतिक्रमणाची समस्या गंभीर असून लोकांच्या सहकार्याने शहरातील अतिक्रमण हटवायचे आहे. -गुणवंत वाहूरवाघ मुख्याधिकारी, नगर परिषद अपघातविरहित वाहतुकीचा निर्धारगोंदिया जिल्ह्यात अपघातविरहित वाहतूक व्हावी आणि त्यासाठी जे-जे शक्य आहे ते करण्याचा संकल्प मी केला आहे. त्यात विशेषत: जड वाहनचालकांचे प्रशिक्षण, वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन व जनजागृती करणारी शिबिरे घेऊन सर्वाना मार्गदर्शन केले जाईल. यासोबतच प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे अशी अपेक्षाही मी जिल्हावासीयांकडून करीत आहे. - एन.आर. निमजेउपप्रादेशिक परिवहन अधिकारीआरोग्य संस्थांचा कायाकल्पजिल्ह्यातील आरोग्य संस्थांचा कायाकल्प करण्यासोबतच निरोगी गोंदिया जिल्हा करण्याचा आपला संकल्प आहे. याशिवाय रुग्णांप्रती सेवाभाव कायम ठेवायचा आहे.- डॉ.रवी धकातेजिल्हा शल्य चिकित्सक