शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्ह्यात ग्रा.पं.साठी ८५.५८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:11 PM

जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी (दि.१६) निवडणूक घेण्यात आली. यासाठी १ हजार ८७ मतदान केंद्रावरुन जवळपास तीन लाख ८२ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

ठळक मुद्देवडेगाव येथील घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान : दुर्गम भागातही मतदारांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी (दि.१६) निवडणूक घेण्यात आली. यासाठी १ हजार ८७ मतदान केंद्रावरुन जवळपास तीन लाख ८२ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यात एकूण ८५.५८ टक्के मतदान झाले. तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील खुनाची घटना वगळता इतर सर्वच केंद्रावर मतदान शांततेत पार पडले.ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गेल्या महिनाभरापासून गावा गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान सोमवारी निवडणूक मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये चांगलाच उत्साह पाहयला मिळाला. विशेष म्हणजे युवा मतदारांनी सुध्दा या निवडणुकीत पुढे येत मतदान केल्याचे चित्र जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावर होते. नक्षलप्रभावीत आणि अतिदुर्गम भागात सुध्दा ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मतदारांमध्ये उत्साह असल्याचे चित्र होते. नक्षलप्रभावीत भागात सकाळी ८ वाजतापासूनच मतदानासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे चित्र होते.त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर दुपारी २ वाजेपर्यंत सरासरी ४० टक्के मतदान झाले होते. सर्वच पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्राच्या परिसरात स्वत:च्या वाहनाने पोहचवित असल्याचे मतदान केंद्रावर पाहयला मिळाले.ग्रामपंचायतची निवडणूक कुठल्याच राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढविली जात नसली तरी सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांना बाहेरून पाठींबा देतात. ग्रामपंचायत निवडणुकीवरच पुढील निवडणुकांचे समीकरण अवलंबून असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पडद्याआड उमेदवारांना मदत करित असल्याचे चित्र काही गावात होते. जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले.३४१ ग्रामपंचातींसाठी मतदानजिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला होता. मात्र यापैकी तीन ग्रामपंचायतची निवडणूक काही नागरिकांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक विभागाने रद्द केली. तर तीन ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध पार पडली. त्यामुळे सोमवारी (दि.१६) रोजी ३४१ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात आली.संवेदनशील केंद्रावर पोलिसांची नजरनिवडणूक विभागाने जिल्ह्यातील ८० वर मतदान केंद्र संवेदनशिल जाहीर केले आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलाही गोंधळ उडू नये, यासाठी निवडणूक आणि पोलिस प्रशासनातर्फे या केंद्रावर करडी नजर ठेवली होती. यासाठी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.काही मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदानगोरेगाव व तिरोडा तालुक्यातील काही मतदान केंद्रावर दुपारी ४.३० वाजतानंतर मतदारांची गर्दी वाढली. त्यामुळे या केंद्रावर सायंकाळी ७ :१५ वाजेपर्यंत मतदान झाल्याची माहिती आहे. याला निवडणूक विभागाने सुध्दा दुजोरा दिला.नेत्यांची प्रतिष्ठा पणालाग्रामपंचायत निवडणूक राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी आहे. येथूनच पुढे जिल्हा परिषद सदस्यापासून आमदार, खासदारकीची निवडणूक लढविली जाते.याच निवडणुकीवर पुढील निवडणुकीचे समीकरण अवलंबून असते. त्यामुळे ग्रामीण भागात आपल्या पक्षाचे वर्चस्व स्थापन करण्यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहयला मिळते. या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांसह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे.आमगाव खूर्दवासीयांचा बहिष्कार कायमसालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द ग्रामपंचायतयला नगर परिषदेचा दर्जा बहाल करण्याच्या मागणीला घेवून आमगाव खुर्द येथील गावकºयांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुकीच्या दिवसांपर्यंत शासन आणि प्रशासनाने कुठलाच निर्णय न घेतल्याने आमगाव खुर्द येथील गावकºयांनी सोमवारी (दि.१६) ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला.उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज३४७ सरपंचपदासाठी एकूण १ हजार ५८ उमेदवार तर ३ हजार २३ सदस्य पदासाठी ५ हजार ८१८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी ८ सरपंच व ३१३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील ८५.५८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मंगळवारी (दि.१७) रोजी सर्वच तालुक्यातील तहसील कार्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मंगळवारी होणार आहे.विजयासाठी उमेदवारांची धडपड३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील ८५.५८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यंदा सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून केली जाणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी उमेदवारांमध्ये चांगलीच चूरस पाहयला मिळाली. जास्तीत जास्त मतदान आपल्या बाजुने व्हावे, यासाठी उमेदवारांची धडपड सुरू होती. यासाठी उमेदवारांनी चारचाकी व दुचाकी वाहनाने वृध्द महिला व पुरूष मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्याची व्यवस्था करुन दिली होती.मतदानात महिला अग्रेसरजिल्ह्यात ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी (दि.१६) निवडणूक घेण्यात आली. यात जिल्ह्यातील एकूण ३ लाख ८२ हजार ८०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. १ लाख ९३ हजार ७२ महिला मतदारांनी तर १ लाख ८९ हजार ९०९ पुरूष मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यात एकूण ८५.५८ टक्के मतदान झाले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानातही महिला अग्रेसर असल्याचे चित्र आहे.