शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक आता शमलेला असून, स्थिती नियंत्रणात आली आहे. घटलेल्या दररोजच्या बाधितांच्या आकडेवारीवरून हे दिसून येत ...

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक आता शमलेला असून, स्थिती नियंत्रणात आली आहे. घटलेल्या दररोजच्या बाधितांच्या आकडेवारीवरून हे दिसून येत आहे. अशात जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील क्रियाशील रुग्णांची संख्या १०च्या आत आली आहे. यामुळे आता हे ६ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या शनिवारपर्यंत १४,१८७ पार झाली असून, दररोज थोड्याफार प्रमाणात का होईना, नवीन बाधितांची भर पडत आहे. यावरून आता जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात येत आहे, हेसुद्धा तितकेच खरे आहे. शिवाय जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने आतापर्यंत १३,८७८ रुग्णांनी कोरोनावर मात दिली आहे. यामुळे आता जिल्ह्यात १२७ क्रियाशील रुग्ण उरले आहेत. विशेष म्हणजे, दररोज येणाऱ्या आकडेवारीत १५ - २०च्या आतच नवीन बाधितांची नोंद घेतली जात आहे. त्या तुलनेत कोरोनावर मात करणारे जास्त येत असल्याने क्रियाशील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, सालेकसा, देवरी, सडक - अर्जुनी व अर्जुनी - मोरगाव तालुक्यात १०च्या आत क्रियाशील रुग्ण दिसून येत आहेत. यावरून नवीन बाधितांची संख्या अशीच कमी राहिल्यास लवकरच हे तालुके कोरोनामुक्त होणार यात शंका नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, गुरुवारी (दि. २८) जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण निघाला नव्हता. यावरून जिल्ह्यात कोरोना नक्कीच नियंत्रणात येणार हे स्पष्ट आहे.

-------------------------------------

६४ रुग्ण घरीच अलगीकरणात

जिल्ह्यात सध्या १२७ रुग्ण क्रियाशील असून, जिल्हावासियांसाठी ही बाब नक्कीच आनंदाची ठरत आहे. त्यातही दिलासादायक बाब म्हणजे, क्रियाशील रुग्णांमध्ये ६४ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. म्हणजेच त्यांची प्रकृती बरी असून, फक्त उपाययोजना म्हणून त्यांना निगराणीत ठेवण्यात आले आहे. ही संख्या अशीच झपाट्याने कमी होत गेल्यास येत्या काही काळात अवघा जिल्हा कोेरोनावर मात करून मुक्त होणार असे चित्र आहे.

---------------------------

उपाययोजनांकडे दुर्लक्ष नकोच

तोंडावर मास्क लावणे, शारीरिक अंतर व स्वच्छता या तीन शस्त्रांमुळे जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आला आहे. मात्र, अशात आता अतिरेक न करता जिल्हावासीयांनी उपाययोजनांचा आपल्या दैनंदिन जीवनात पुढेही अंमल करणे गरजेचे आहे. यामुळेच आता यापुढेही तोंडावर मास्क व शारीरिक अंतराचे पालन तसेच स्वच्छता ही जीवनातील अविभाज्य बाब बनविण्याची गरज आहे.