शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
3
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
4
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
5
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
6
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
9
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
10
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
11
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
20
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

४६७ रेल्वे फाटक देतात मृत्यूला आमंत्रण

By admin | Updated: July 15, 2014 00:04 IST

दरवर्षी रेल्वेला हजारो कोटींचा नफा होत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी रेल्वे विभाग नफ्यात की तोट्यात याची माहिती प्रवाशांना झाली नाही. दारिद्रयरेषेखालील असलेली नागपूर विभागाची

गोंदिया : दरवर्षी रेल्वेला हजारो कोटींचा नफा होत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी रेल्वे विभाग नफ्यात की तोट्यात याची माहिती प्रवाशांना झाली नाही. दारिद्रयरेषेखालील असलेली नागपूर विभागाची रेल्वे नागरिकांना मृत्यूच्या दाढेत ओढवणारी आहे. नागपूर विभागातील ७१५ रेल्वे फाटकांपैकी ४६७ रेल्वे फाटक मानवविरहित आहेत. यामुळे निर्मनुष्य रेल्वे फाटकांवर मोठे अपघात घडत आहेत.
रेल्वेला दरवर्षी हजारो कोटींचा फायदा होत असल्याचे आर्थिक संकल्पात सांगितले जाते. रेल्वे प्रवासी भाडे वाढवून आता रेल्वने मोठा नफा कमविण्याचा प्रयत्न केला. रेल्वेला मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या महसूलच्या रकमेतून रेल्वेस्थानकांना मॉडल स्टेशन बनविण्यासाठी रेल्वे विभागाचे प्रयत्न सुरू आहे. परंतु मानवविरहित रेल्वे फाटकांवर मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात रेल्वे विभाग अपयशी ठरला आहे.
त्या मानवविरहित रेल्वे फाटकांवर मनुष्यबळाची व्यवस्था न करता नागरिकांनीच या रेल्वे फाटकावरून ये-जा करताना गाडी येत आहे का याची खात्री करूनच रुळ ओलांडावे लागते.
गोंदिया ते चंद्रपूर या रेल्वे रूळावर ८९ रेल्वे फाटक मानवविरहित आहेत. चंद्रपूर ते नागपूर या रूळावर १६६ रेल्वे फाटक मानवविरहित आहेत तर रामटेक, बिरसोला, रुमनापूर, लामठा, बालाघाट, वारासिवनी, गोवारीघाट, नैनपूर, चिरालडोंगरी, इतवारी व खापरखेडा या रेल्वे रुळावर २१२ रेल्वे फाटक मानवविरहित आहेत.
रेल्वे विभागातर्फे अनावश्यक बाबीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येते. परंतु अत्यावश्यक ठिकाणी रेल्वे विभाग खर्च करण्यात मागे-पुढे पाहत आहे. गोंदिया ते चंद्रपूरदरम्यान असलेल्या मानवविरहित फाटकांवर मागील ७ वर्षात १५ अपघात घडले. यात मोठ्या प्रमाणात प्राणहानी व वित्तहानी झाली. रेल्वे रुळालगत झाडे-झुडपे असल्याने मानवविरहित फाटक ओलांडणाऱ्या वाहनांना गाडी येते किंवा नाही याची माहितीही होत नाही.
परिणामी मानवविरहित फाटकांवर अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. ७१५ पैकी ४६७ रेल्वे फाटक मानवविरहित आहेत. तर काही फाटकांव रेल्वे विभागाने मोबाईल मॅन ठेवले आहेत. या मानवविरहीत फाटकावर फाटक बसविण्यात आले नाही. किंवा मनुष्यबळाची निर्मीती केली नाही त्यामुळे दरवर्षी या फाटकांवर अपघात घडतात. (तालुका प्रतिनिधी)