शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा मानधन रोखण्याची शक्यता; 'गृह आधार'चे ५० हजार लाभार्थी सरकारच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:31 IST

गृह आधार गृहिणींसाठी असलेली सरकारची योजना

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'गृह आधार'च्या लाभार्थीनी ३१ मेपूर्वी उत्पन्नाचा तसेच स्वतः हयात असल्याचा दाखला सादर न केल्यास त्यांचे नाव योजनेतून वगळले जाऊ शकते किंवा त्यांचे मानधन रोखले जाऊ शकते, अशा इशारा देण्यात आला आहे. सुमारे ५० हजार लाभार्थी गृहिणींना याचा फटका बसू शकतो, अशी माहिती मिळाली आहे.

महिला आणि बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. सरकारने अनेक लाभार्थ्यांना एसएमएस पाठवून या गोष्टीचे स्मरण करून दिले आहे. तरीदेखील हजारो महिलांनी मागील काही महिन्यांपासून हे दस्तऐवज सादर केलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास खात्याने आता अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार लाभार्थीने स्वतः हयात असल्याचा तसेच उत्पन्नाचा दाखलाही दरवर्षी द्यावा लागेल.

गृहिर्णीसाठी असलेली ही सरकारची एक महत्त्वाची योजना असून २०१२ मध्ये ती सुरू करण्यात आली. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी आणि गरीब तसेच मध्यमवर्गीय गृहिणींचे जीवनमान उंचावण्यासाठी दरमहा आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. पात्र महिलांचे दरमहा १,५०० रुपये थेट न त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

सरकारच्या तिजोरीचे नुकसान टाळण्यासाठी पडताळणी करण्याचे काम आता खात्याने हाती घेतले आहे. अनेकदा लाभार्थी मृत झाल्यानंतरही त्यांच्या नावे मानधन उचलले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. मृत व्यक्तीच्या नावे पैसे जमा झाले असतील आणि ते काढले गेले असतील, तर सरकार संबंधित रकमेची वसुली करण्याची प्रक्रिया सुरू करू शकते.

१ लाख ८० हजार लाभार्थी

अधिकृत माहितीनुसार 'गृह आधार'च्या सुमारे १ लाख ८० हजार लाभार्थी गृहिणी आहेत. पैकी ५० हजार जणींनी अजून वरील दस्तऐवज सादर केलेले नाहीत. महिला व बालविकास खात्याने अशा लाभार्थीना एसएमएसद्वारे सूचना व नोटिसा पाठविल्या आहेत. आवश्यक कागदपत्रे न दिल्यास योजनेतील मासिक आर्थिक मदत १५०० रुपये बंद होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.

कागदपत्रांसाठी ३१ मे पर्यंत मुदत

नवीन निर्णयानुसार, सर्व लाभार्थ्यांनी दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत स्वतः हयात असल्याचा आणि उत्पन्नाचा दाखला निर्धारित नमुन्यात आपल्या तालुका स्तरावरील महिला व बाल विकास ब्लॉक कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील. दरवर्षी उत्पन्न आणि हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यामुळे केवळ गरजू आणि पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल, असे सरकारला वाटते.

English
हिंदी सारांश
Web Title : Home Support Scheme: 50,000 beneficiaries face stipend suspension risk.

Web Summary : 50,000 'Home Support' beneficiaries risk stipend suspension for failing to submit income and existence proof by May 31. The government requires annual document submission to ensure only eligible recipients receive monthly financial aid of ₹1,500, preventing fraudulent claims.
टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार