शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

गोंयात कोळसो नाका आंदोलन, मडगाव-फातोर्डात उत्स्फूर्त पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 8:21 PM

केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मडगाव व फातोर्डा येथे काढलेल्या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.

मडगाव - गोव्यात सुरू झालेल्या कोळशा विरोधातील आंदोलनाला सासष्टीत चांगला प्रतिसाद मिळत असून सोमवारी केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मडगाव व फातोर्डा येथे काढलेल्या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.

या आंदोलनाला गोवा फॉरवर्डनेही पाठिंबा दिला असून सोमवारी या रॅलीत आमदार विजय सरदेसाई यांनीही भाग घेतला. गोव्याच्या पर्यावरणाला घातक असलेल्या सर्व प्रकल्पना आपल्या पक्षाचा विरोध असेल असे त्यांनी सांगितले. त्यापूर्वी दुपारी हे आंदोलन सुरू केलेल्या 'गोयांत कोळसो नाका' या संघटनेच्या पदधिकाऱ्यानी  विजय सरदेसाई यांची भेट घेऊन सागरमाला प्रकल्प गोव्यासाठी कसा घातक हे सांगणारे निवेदन दिले.

ही रॅली फातोर्ड येथील रोजरी चर्च जवळून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला वळसा घालून बोर्डा  मार्गे आल्यानंतर मडगाव येथून आके, कोकण रेल्वे परिसराला वळसा घालून मडगाव शहरात तिची समाप्ती करण्यात आली. कोळसा वाहतूकीला गोवा राज्यातून  निषेध करण्यासाठी ही चळवळ या संघटनेकडून उभारण्यात आली आहे. या बरोबरच या संघटनेने दुहेरी रेल्वे मार्गालाही विरोध केला आहे. हे आंदोलन तीव्र करण्यासाठी दोन ऑक्टोबर पासून प्रत्येक गावात जागृती करण्याकरिता रॅलीचे आयोजन  केले आहे.

याची सुरुवात गिर्दोली चांदर पासून  त्यांनी केली होती. या नंतर गोव्यातील प्रत्येक गावात ही रॅली जाणार असून या दरम्यान या प्रकल्पा पासून गोव्यातील वन संपदा नष्ट होईल तसेच पर्यावरण हानी होणार असल्याचे लोकांना सांगण्यात येणार असल्याचे या संघटनेचे संयोजक आंतोनियो डिसिल्वा यांनी सांगितले.

पुढे ते बोलताना म्हणाले की ही कुठलीही राजकीय चळवळ नाही. आम्ही या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास केला आहे. या प्रकल्पामुळे गोव्यातील जनतेला कुठलाही फायदा नाही. या प्रकल्पामुळे कोळसा रेल्वे मार्गावरून कर्नाटक येथे जाणार आहे. या रेल्वेच्या प्रकल्पा बद्दल केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी गोव्यातील जनतेला अंधारात ठेवले आहे.चांदर येथील फेलिक्स फुर्तादो यांनी सांगितले की या रेल्वे वाहतुकीत हरित गोव्याचे  अस्तित्व धोक्यात येणार आहे. या रेल्वेतून दर दिवशी कोळसा वाहतूक होणार आहे. या दरम्यान उडणारे कण सभोवतीच्या परिसरात पसरणार आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होणार आहे असल्याचे शेवटी त्याने सांगितले.

 

टॅग्स :goaगोवा