शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

गोव्यात रोज सरासरी ६८ जणांना श्वानदंश, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 12:58 PM

गोव्यात रोज सरासरी ६८ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्याचे गेल्या पाच महिन्यांत निष्पन्न झाले आहे

पणजी : गोव्यात रोज सरासरी ६८ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्याचे गेल्या पाच महिन्यांत निष्पन्न झाले आहे. राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून ती मोठी डोकेदुखी ठरली आहे. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार गोव्यात रेबिजचे प्रमाण घटले आहे. असे असले तरी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे लोकांना ते मोठे तापदायक ठरले आहे. चालू वर्षात पहिल्या पाच महिन्यात १०,३४० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला असल्याची नोंद आरोग्य खात्यात झालेली आहे. ही आकडेवारी पाहता दर दिवशी साधारणपणे ६८ जणांना श्वानदंश झाल्याचे स्पष्ट होते. आरोग्य खात्याकडे एवढी नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात त्याहून आकडा जास्त असण्याची शक्यता आहे.

गोवा पर्यटनस्थळ आहे. किनाऱ्यांबरोबरच येथील मंदिरे, चर्च तसेच अन्य प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर देशी-विदेशी पाहुण्यांची नेहमीच गर्दी असते. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पर्यटकांनाही होत आहे. किनाऱ्यांवर पडून राहिलेला कचरा तसेच अस्वच्छता यामुळे भटकी कुत्री किनाऱ्यावरदेखील फिरताना दिसतात. किनार्‍यांवर पर्यटकांनाही त्या कुत्र्यांचा त्रास होत आहे. सरकारची अधिकृत माहिती सांगते की रेबिजचे एकही प्रकरण गेल्या वर्षभरात राज्यात नोंद झालेले नाही.

गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीम सरमोकादम यांच्या मते ठिकठिकाणी वाढलेल्या कचऱ्यामुळे भटकी कुत्री वाढलेली आहेत. कत्तलखान्याचे टाकाऊ साहित्य तसेच कचरा अनेकदा उघड्यावर फेकला जातो. त्यामुळे कुत्री तेथे आढळतात आणि त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी गोव्यात येतात. हे पक्षी अंडी घालतात. ही अंडी नष्ट करण्याचे काम कुत्री करत असतात असे सरमोकादम म्हणाले. राज्यात पोपट तसेच अन्य पक्षांचे प्रमाण घटण्याचे कारण काय याचा शोध घ्यावा लागेल, असे ते म्हणाले. जैवविविधता मंडळाचे सदस्य मारियानो फर्नांडिस यांच्या मते विदेशी पर्यटक गोव्यात येतात. पाच- सात महिने वास्तव्य करून राहतात. हे पाहुणे कुत्री पाळतात आणि नंतर त्यांना सोडून देतात. अशा कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. गोवा कॅन या ग्राहक चळवळीचे संस्थापक रोलँड मार्टिन यांच्यामध्ये उघड्यावरफेकलेला कचरा हेच कुत्र्यांची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण आहे. कचरा व्यवस्थापन योग्यरीत्या झाले तर ही समस्याच राहणार नाही, असे ते म्हणाले.