शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

मोठ्या संख्येने झालेले मतदान भाजपच्या विरोधात: काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2024 11:03 AM

निवडणुकीत इंडिया आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येत ते संसदेत खासदार म्हणून जातील, असा विश्वास अमित पाटकर यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मोठ्या संख्येने झालेले मतदान भाजपच्या विरोधात असल्याचे दिसते. निवडणुकीत इंडिया आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येत ते संसदेत खासदार म्हणून जातील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

भाजप सरकार दरवेळी लोकांची फसवणूक करू शकत नाही. लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करून आपला राग व्यक्त केला आहे. मतदान ७६ टक्के झाल्याने भाजप सुद्धा आश्चर्यचकीत झाला आहे. निकाल काँग्रेसच्या बाजूने लागणार हे ४ जून रोजी होणाऱ्या निकालावेळीच समजेल, असेही पाटकर यांनी सांगितले.

पाटकर म्हणाले, सासष्टीत यंदा १२ टक्के मतदान तर खाणग्रस्त भागात ७.३ टक्के मतदान वाढले आहे. लोकांनी यावेळी भाजपच्या विरोधात मतदान केले आहे, हे यावरूनच स्पष्ट होते. दक्षिण गोव्याप्रमाणेच उत्तर गोव्यातील मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. जनतेने आपला निकाल दिला आहे.

लोकांनी एकूणच या मतदानाला चांगला प्रतिसाद दिला आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनीही निवडणुकीच्या प्रचारात मोठे सहकार्य केले आहे. दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष अॅड. अमित पालेकर म्हणाले, गोव्यातील अशा भागात मुख्यमंत्री कधीही गेले नव्हते, तेथे सुद्धा त्यांनी प्रचार केला. इंडिया आघाडीच्या भीतीनेच त्यांनी प्रचार केला.

निवडणुकीचा निकाल काय लागेल, हे माहीत नाही, मात्र लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केले. यावरून त्यांचा मतदान प्रक्रियेवर पूर्ण विश्वास असल्याचेच दिसते. पेडणे ते काणकोणपर्यंत इंडिया आघाडीने प्रचार केल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४south-goa-pcदक्षिण गोवाnorth-goa-pcउत्तर गोवा