शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

लोकबिरादरी प्रकल्पाच्या पुढाकाराने २५ तलावांचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST

रमेश मारगोनवार भामरागड : सिंचनाचा सुविधेपासून वंचित असलेल्या भामरागड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्पाने तलाव ...

रमेश मारगोनवार

भामरागड : सिंचनाचा सुविधेपासून वंचित असलेल्या भामरागड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्पाने तलाव निर्मितीचे काम हाती घेतले. गेल्या तीन वर्षांत २५ तलावांचे काम पूर्णत्वास गेले आहे. या तलावांत साचणाऱ्या पाण्यातून आता तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर विसंबून न राहता रब्बी हंगामातही पीक घेता येणार आहे.

भामरागड तालुका हा अनेक वर्षांपूर्वी राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका आहे. मात्र, या तालुक्यातील विविध समस्या अजूनही आ वासून उभ्या आहेत. इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा या बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही सिंचनाची सुविधा नाही. वनक्षेत्र आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या नद्या असूनही त्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करणे आतापर्यंत जमले नाही. परिणामी आजही तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच शेती करावी लागते.

ही परिस्थिती दूर करण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी शेतकऱ्यांच्या सहभागातून काही गावांमध्ये तलाव निर्माण करण्याचे काम २०१६ पासून हाती घेतले. भामरागड तालुक्यातील जिंजगावातून तलाव निर्मितीचे काम सुरू केले. अहेरी तालुक्यातील वेडमपल्ली येथील तलावाचे काम नुकतेच पूर्ण झाले. आतापर्यंत विविध गावांत असे २५ तलाव तयार करण्यात यश आले.

(बॉक्स)

पुढेही शक्य ती मदत करणार

याबाबत बोलताना अनिकेत आमटे यांनी सांगितले, भामरागड तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही सिंचन सुविधेअभावी शेतीचा विकास झाला. ही बाब लक्षात घेऊन तलाव निर्मितीचा संकल्प केला. या तलावांच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेणे सोयीचे होईल. कोरड्या दुष्काळापासून शेती वाचविता येईल. तसेच त्या तलावात मासेमारीही करता येईल. एवढेच नाही तर जमिनीतील पाणी पातळी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक गावकऱ्यांनी आमच्या गावात तलाव निर्माण करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुढेही शक्य होईल तेवढी मदत शेतकऱ्यांसाठी करणार, असे अनिकेत यांनी सांगितले.