शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

घरात चुली पेटविण्यासाठी सरपण आणायला गेल्या; टिपून बसलेल्या वाघाने एकाच गावातील दोन महिलांचा घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 20:01 IST

Gadchiroli : सरपणासाठी जंगलात जाणे हा या गावातील महिलांचा रोजचा प्रवास. कुटुंब चालवण्यासाठी चुली पेटविणे गरजेचे आणि चुलीसाठी सरपण. गावापासून अगदी शंभर-दोनशे मीटरवर वाघाचा संचार असतानाही जगण्यासाठीचा संघर्ष थांबत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवडधा : सरपणासाठी जंगलात जाणे हा या गावातील महिलांचा रोजचा प्रवास. कुटुंब चालवण्यासाठी चुली पेटविणे गरजेचे आणि चुलीसाठी सरपण. गावापासून अगदी शंभर-दोनशे मीटरवर वाघाचा संचार असतानाही जगण्यासाठीचा संघर्ष थांबत नाही. गरिबीमुळे वाघाच्या भीतीच्या सावटातही उपजीविकेसाठी जंगलातून सरपण आणावे लागते. वाघ शिकारीवर टपूनच असतो व हल्ला करतो. देऊळगावातही हेच घडले. सरपण गोळा करताना दोन महिलांना वाघाने भक्ष्य बनविले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दोन घटना आरमोरी तालुक्यात बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आल्या. वाघाच्या दहशतीतही सरपणाने चुली पेटविणाऱ्या दोन मातांची अखेर चिताच पेटली.

जंगलालगतच्या गावात सरपणासाठी जाणे हा महिलांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग. मात्र, हीच दिनचर्या दोन मातांसाठी मृत्यूचे दार ठरली. मुक्ताबाई दिवाकर नेवारे (वय (७०) आणि सरस्वताबाई झिगर ताघ (वय ७०, रा. देऊळगाव, ता. आरमोरी) या दोन्ही महिलांचे मृतदेह बुधवारी दोन वेगवेगळ्या शोधमोहिमेत सापडले.

मुलाला वाटले आई गेली ताईकडे, पण घडले आक्रीत; आठ दिवसांपासून सुरू होता शोध सरस्वताबाई झिगर वाघ ह्या देऊळगाव येथील झोपडपट्टी टोलीवर राहत होत्या. शेती नसल्यामुळे कुटुंब मोलमजुरीवर, मुलापासून वर्षानुवर्षे दूर राहणाऱ्या सरस्वताबाईचा संसार तुटका, पण मन मात्र मुलांकडेच. १२ नोव्हेंबरला त्या सरपणासाठी घराजवळच्या झुडपी जंगलात गेल्या. दिवस गेला... दोन दिवस गेले... मुलाला वाटले त्या कदाचित सावत्र मुलीकडे सावलखेडा येथे गेल्या असतील. शोध घेऊनही काहीच माहिती मिळाली नाही. अखेर आठ दिवसांनी घराजवळील झुडपी जंगलातून येणाऱ्या दुर्गंधीने सर्वांचे लक्ष वेधले. शोथमोहिमेअंती घरापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. घटनास्थळी जमा केलेल्या काड्या, परिसरात वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या. त्यामुळे वाघाने हल्ला केल्याचा संशय वास्तवात बदलला.

मुलीला आईची प्रतीक्षा; पण सायंकाळी घरी आला मृतदेह, कुटुंबाचा आक्रोश !

मुक्ताबाई नेवारे यांना दोन मुली. एक मुलगी इंजेवारी येथे दिली आहे, तर दुसरी मुलगी देऊळगावातच नांदते. मुक्ताबाई या बुधवारी दुपारी सरपणासाठी घरापासून अवघ्या अर्था किलोमीटर अंतरावर जंगलात गेल्या. त्यांची मुलगी धान कापणीसाठी शेतावर, संध्याकाळी मुलगी घरी परतली तेव्हा आई दिसेना.

शेजाऱ्यांना विचारले असता 'काडांना गेल्या' इतकीच माहिती मिळाली. सायंकाळ झाली, अंधार वाढला, तरी मुक्ताबाई परतल्या नाहीत. गावकऱ्यांनी पोलिस व वनविभागाला कळवले. अंधारात सुरू झालेल्या शोधमोहिमेत रात्री ७:३० वाजेच्या सुमारास जंगलात त्यांचा मृतदेह आढळला. दोन मुलींच्या या आईचा जीव सरपणाच्या चुलीसाठी चुकला.

English
हिंदी सारांश
Web Title : Tiger Kills Two Women Collecting Firewood in Maharashtra Village

Web Summary : Two women from Deulgaon, Maharashtra, died after being attacked by a tiger while collecting firewood. Driven by poverty, they ventured into the forest near their village. Their bodies were found after separate searches, highlighting the deadly struggle for survival in the area.
टॅग्स :Tigerवाघleopardबिबट्याGadchiroliगडचिरोलीDeathमृत्यूforestजंगलforest departmentवनविभागPoliceपोलिस