शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात शिक्षकांच्या आॅनलाईन प्रशिक्षणाला सुरूवात

By admin | Updated: April 28, 2015 02:11 IST

जिल्ह्यातील १३ केंद्रावरील ९०० शिक्षकांना आॅनलाईन पध्दतीने पहिल्यांदाच प्रशिक्षण देण्याला सुरूवात झाली.

१३ केंद्रांची निर्मिती : शिक्षकांमध्ये दिसत होता उत्साह व उत्सुकता
गडचिरोली :
जिल्ह्यातील १३ केंद्रावरील ९०० शिक्षकांना आॅनलाईन पध्दतीने पहिल्यांदाच प्रशिक्षण देण्याला सुरूवात झाली. आॅनलाईन पध्दतीने प्रशिक्षणाची ही पहिलीच वेळ असल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून येत होते.
वर्षभर चालणाऱ्या शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने यावर्षी पहिल्यांदाच आॅनलाईन पध्दतीने प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला. पाचव्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्याने या बदलेल्या अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी या वर्गाला शिकविणाऱ्या ९०० शिक्षकांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १३ प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. यामध्ये गडचिरोली येथे शिवाजी विद्यालय व डायट कॉलेज, चामोर्शी येथे गट साधन केंद्र चामोर्शी व यशोदीप डीएड् कॉलेज, अहेरी येथे गट साधन केंद्र व ग्लोबल विद्यालय आलापल्ली येथे प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात आले आहे. अहेरीतील गट साधन केंद्रात अहेरी तालुक्यातील शिक्षक तर ग्लोबल विद्यालय आलापल्ली येथे एटापल्ली व भामरागड तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी, मुलचेरा, सिरोंचा, धानोरा तालुकास्तरावर त्या-त्या तालुक्याच्या शिक्षकांच्या प्रशिक्षणाची सोय करण्यात आली. प्रशिक्षणाचा आज पहिला दिवस होता. आॅनलाईन पध्दतीने प्रशिक्षण होण्याची पहिलीच वेळ असल्याने शिक्षकांमध्ये उत्साह व उत्सुकता दिसून येत होती. मात्र काही शिक्षकांची नेमणूक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे सदर शिक्षक मंगळवारपासून प्रशिक्षणाला हजर राहू शकणार नाही. त्यामुळे थोडे निराशेचे वातावरणही दिसून येत होते.
आरमोरी येथील गटसाधन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या आॅनलाईन प्रशिक्षणाला तालुक्यातील ८० शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी गट शिक्षणाधिकारी डी. जी. नरोटे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

आॅनलाईन प्रशिक्षण चांगले असले तरी जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये नेट कनेक्टिव्हीटीची समस्या आहे. त्यामुळे काही केंद्रावर चित्र दिसताना अडचण निर्माण होत होती. तर काही काळ इंटरनेट सुरू होण्यास अडचण निर्माण झाल्याने शिक्षकांमध्ये गोंधळ उडाला.