शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
3
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
4
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
5
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
6
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
7
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
8
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
9
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
10
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
11
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
12
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
13
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
14
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
15
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
16
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
17
'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
18
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
19
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
20
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीमुळे शेणखताचे दर वधारले

By admin | Updated: May 23, 2015 02:00 IST

रासायनिक खताच्या अतीवापराने बिघडलेला जमिनीचा पोत आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी कृषी विभागाच्या तज्ज्ञांनीकडून मार्गदर्शन मिळत आहे.

७०० ते हजार रूपये ट्राली शेणखत : रासायनिक खताच्या वाढत्या किमतीचा परिणाम
वैरागड : रासायनिक खताच्या अतीवापराने बिघडलेला जमिनीचा पोत आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी कृषी विभागाच्या तज्ज्ञांनीकडून मार्गदर्शन मिळत आहे. तसेच रासायनिक खताच्या किमती वाढल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळला आहे. परिणामही शेणखताच्या किमतीही वाढल्या आहे. सध्या ग्रामीण भागात ७०० ते हजार रूपये पर्यंत शेण खताच्या एका ट्रालीला शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहे.
ग्रामीण भागात पशुपालक शेतकऱ्यांची सख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शेणखतही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. शहरी भागातील तसेच मोठ्या गावातील शेतकरी शेणखतासाठी खेडेगावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शेणखताच्या किमती वधारल्या आहे. मागील पाच वर्षांत वन हक्काच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे क्षेत्र वाढले. त्यामुळे नव्याने उटविण्यात आलेल्या शेत जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेणखताचा वापर केला जातो. त्यामुळे शेणखताची मागणी वाढली आहे.
शेतकऱ्यांना मागणीनुसार रासायनिक खताची उपलब्धतता न होणे तसेच कंपन्या व कृषी सेवा केंद्र संचालकाच्या मनमानीमुळे बांधावार खत योजनेचा फज्जा उडाला. त्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले. त्यामुळे यंदा शेतकरी शेणखत टाकून शेतीची सुपिकता वाढविण्यावर भर देत आहे. त्यामुळे शेणखताचे भाव चांगले वधारले आहे. (वार्ताहर)
ंरासायनिक खताचा अपुरा पुरवठा
कृषी विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकऱ्यांना अनेकदा गरजेच्या वेळी रासायनिक खत मिळत नाही. मिळाले तरी काळा बाजारामुळे अधिक पैसे मोजावे लागतात. रासायनिक खताच्या वाढत्या किमती धान उत्पादक शेतकऱ्यांना परवडण्यासारख्या नाही.
- रामचंद्र क्षीरसागर, शेतकरी वैरागड
सेंद्रिय खताचे चांगले फायदे
शेणखत, तृणखत वापरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होत आहे. सेंद्रिय खताचे फायचे चांगले आहेत. आम्ही आता रासायनिक खताचा वापर करीत नाही. मागील पाच वर्षात सेंद्रिय खताचे चांगले परिणाम दिसून आले.
- महेंद्र तावेडे, शेतकरी तथा
अध्यक्ष, सेवा सहकारी संस्था, वैरागड