शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार हेक्टरवर पेरणी

By admin | Updated: July 5, 2015 01:36 IST

जिल्ह्यातील एकूण १ लाख ६६ हजार हेक्टरपैकी १० हजार ५६७ हेक्टरवर धानाचे पऱ्हे व इतर खरीप पिकांची पेरणी १ जुलैपर्यंत करण्यात आली ...

गडचिरोली : जिल्ह्यातील एकूण १ लाख ६६ हजार हेक्टरपैकी १० हजार ५६७ हेक्टरवर धानाचे पऱ्हे व इतर खरीप पिकांची पेरणी १ जुलैपर्यंत करण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन धान पिकाचे घेतले जाते. यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ४९ हजार २८३ हेक्टरवर धान पिकाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार बियाणे व खते वेळेवर उपलब्ध होतील, यादृष्टीनेही कृषी विभागाने पूर्वीपासूनच नियोजन केले होते. योग्य नियोजनामुळे शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध झाले.
१ जुलैपर्यंत सुमारे ५ हजार ५७८ हेक्टरवर धान पिकांच्या पऱ्ह्यांची लागवड करण्यात आली आहे. १० पटीच्या तुलनेत पऱ्हे टाकले जात असल्याने सदर पऱ्यांच्या सहाय्याने ५५ हजार ७०० हेक्टरवर धान पिकाची रोवणी होऊ शकणार आहे. ७ हजार १८० हेक्टरवर आवत्या पध्दतीने धान पिकाची लागवड करण्यात आली आली आहे.
पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीला चार दिवस मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यामुळे जमिनीत प्रचंड प्रमाणात ओलावा निर्माण झाला होता. ओलावा असताना पिकांची पेरणी करणे शक्य होत नाही. १ जुलैपर्यंत जमीन ओलीच असल्याने शेतकऱ्यांनी पाहिजे त्या प्रमाणात धान पिकाचे पऱ्हे टाकले होते. त्याचबरोबर इतर पिकांचीही पेरणी केली नाही. १ जुलैनंतर मात्र पावसाने उसंत घेतल्याने पेरणीला वेग आला आहे. मागील चार दिवसांच्या कालावधीत बहुतांश पेरण्या आटोपल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (नगर प्रतिनिधी)
रोवणीला सुरूवात
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी पावसाची वाट न बघता सुरूवातीलाच पऱ्हे टाकले होते. अशा शेतकऱ्यांचे पऱ्हे आता रोवणीस तयार झाले असल्याने रोवणीचे काम सुरू झाले आहे. गडचिरोली तालुक्यात १ जुलैपर्यंत सहा हेक्टर व मुलचेरा तालुक्यात दोन हेक्टरवर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. प्रत्यक्षात बहुतांश तालुक्यात काही शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली आहे.
१:१० प्रमाणात पऱ्ह्यांची पेरणी
धानाचे सर्वप्रथम पऱ्हे टाकले जातात. त्यानंतर त्याची रोवणी केली जाते. पऱ्हे व रोवणीचे प्रमाण १:१० एवढे ठेवले जाते. म्हणजेच एक हेक्टर क्षेत्रावरील पऱ्ह्यांच्या सहाय्याने १० हेक्टर क्षेत्रावर रोवणी करता येणे शक्य होते. त्यामुळे पेरणीची आकडेवारी सुरूवातीला कमी दिसून येते.