शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचातील जैवविविधता उद्यानाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:01 IST

सदर वनोद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, झुले, घसरपट्टी, ट्री-होम आदींची व्यवस्था करण्यात आली. बसण्यासाठी बैलबंडीच्या चाकाच्या सहाय्याने पिरॅमिड्स बनविण्यात आले. नागरिकांना बसण्यासाठी छोट्या-छोट्या गवतांच्या कुटी बनविण्यात आल्या. भव्य व प्रशस्त असलेल्या या जैवविविधता उद्यानात सिरोंचा शहरासह तालुक्यातील बरेच लोक फिरायला येत होते.

ठळक मुद्देवनौषधींची झाडे झाली नामशेष : वनविभागाने झटकली देखभालीची जबाबदारी

कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : वनविभागाच्या वतीने सिरोंचा शहरालगत निजामाबाद-जगदलपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या स्वरूपाचे जैवविविधता उद्यान उभारण्यात आले. लाखो रुपयांच्या खर्चातून येथे विविध प्रकारची झाडे तसेच वनौषधींचे रोपटे लावण्यात आले. शिवाय नागरिक व बालकांसाठी विविध प्रकारची खेळणी व साहित्य बसविण्यात आले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या जैवविविधता उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. हे उद्यान आता शेवटच्या घटका मोजत आहेत.
सदर वनोद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, झुले, घसरपट्टी, ट्री-होम आदींची व्यवस्था करण्यात आली. बसण्यासाठी बैलबंडीच्या चाकाच्या सहाय्याने पिरॅमिड्स बनविण्यात आले. नागरिकांना बसण्यासाठी छोट्या-छोट्या गवतांच्या कुटी बनविण्यात आल्या. भव्य व प्रशस्त असलेल्या या जैवविविधता उद्यानात सिरोंचा शहरासह तालुक्यातील बरेच लोक फिरायला येत होते. मात्र वनविभागाचे सदर वनोद्यानाच्या देखभालीकडे प्रचंड दुर्लक्ष झाल्याचे या वनोद्यानाच्या स्थितीवरून दिसून येते. नागरिकांसाठी बनविण्यात आलेल्या गवतांच्या कुटी जीर्ण अवस्थेत आहेत. बैलबंडीच्या पिरॅमिडला उधळी लागली असून ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. येथे अनेक झुले लावण्यात आले होते. मात्र या झुल्याचे केवळ स्टॅड उरले आहेत. मुख्य भाग व झुले गायब झाले आहेत. खेळणी फुटून खाली पडल्या आहेत. ट्रि होमची दुरस्था झाली असून सदर उद्यानातील हिरवेगार गवत आता दिसेनासे झाले आहे. हे गवत सुकून पडले असून केवळ पानांचा सडा दिसत आहे. सदर उद्यानातील वनौषधींची झाडेही नामशेष झाली असून झाडासमोर लावलेले फलक तेवढे शिल्लक आहेत.

विकासाबाबत वनाधिकारी उदासीन?
गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के जंगल असून सर्वाधिक जंगल अहेरी उपविभागात आहे. आलापल्ली व सिरोंचा या दोन विभागातील जंगलात मौल्यवान सागवान झाडे आहेत. जंगलावर विविध प्रक्रिया उद्योग निर्माण केल्यास या भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी शासनासह वनाधिकाऱ्यांची मानसिकता सकारात्मक असणे गरजेचे आहे. मात्र सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागातील अनेक वन अधिकारी काही प्रमाणात उदासीन असल्याचे दिसून येतात. सिरोंचा वनविभागाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून बनविलेल्या जैवविविधता उद्यानाची देखभाल, संरक्षण करण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. सदर वनोद्यानाला आणखी विकसित करण्यासाठी आजपर्यंतच्या वनाधिकाºयांकडून कोणतेही ठोस नियोजन व प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग