लोकमत न्यूज नेटवर्कघोट : घोट-चामोर्शी मार्ग मोठ्या प्रमाणात उखळलेला असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाची वर्षातून दोन ते तीनवेळा डागडुजी करण्यात येते. मात्र अल्पावधीतच तो मार्ग जैसे थे होते. या मार्गाची नव्याने डांबरीकरण करावे, अशी मागणी या पसिरातील नागरिकांकडून होत आहे.घोट-चामोर्शी मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. चामोर्शी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने घोट परिसरातील रेगडी, विकासपल्ली, चापलवाडा, मकेपल्ली, एटापल्ली, आलापल्ली ते देवदा मार्गाने मोठ्या प्रमाणात नागरिक चामोर्शीकडे ये-जा करीत असतात. सदर मार्गाने दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहनासह एसटी महामंडळाची बसेसच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात सुरु असतात. परंतु घोट-चामोर्शी मार्गाची दुरवस्था झाली असून मोठ्या प्रमाणात मार्ग उखळलेला आहे.श्रीनीवासपूर ते गोलाबाईपर्यंतचा मार्ग मोठ्या प्रमाणात उखडला आहे. मार्ग अरूंद असल्याने दोन वाहने समोरासमोर आल्यास दोन्ही वाहनाला साईड देण्यास खूप अडचणी येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. या मार्गाचे रूंदीकरण करावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.ठिकठिकाणी खड्डे पडून गिट्टी बाहेर निघाली आहे. दुचाकी वाहनधारकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी तर गिट्टी पूर्णपणे निघून जमिनीवरील माती बाहेर निघाली आहे. पावसळ्यात यामध्ये पाणी साचून प्रवास करणे कठीण होणार आहे.
घोट-चामोर्शी मार्गाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 6:00 AM
घोट-चामोर्शी मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. चामोर्शी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने घोट परिसरातील रेगडी, विकासपल्ली, चापलवाडा, मकेपल्ली, एटापल्ली, आलापल्ली ते देवदा मार्गाने मोठ्या प्रमाणात नागरिक चामोर्शीकडे ये-जा करीत असतात. सदर मार्गाने दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहनासह एसटी महामंडळाची बसेसच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात सुरु असतात.
ठळक मुद्देनागरिक त्रस्त : डांबरीकरण करण्याची घोट परिसरातील नागरिकांची मागणी