शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

शेतात एकही थेंब न जाता लाखाे रुपये पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:45 IST

गडचिराेली जिल्ह्यात सिंचनाच्या साधनांचा अभाव आहे. माेजक्याच शेतकऱ्यांकडे सिंचनाची साेय असल्याने ते वर्षभर शेती कसत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे ...

गडचिराेली जिल्ह्यात सिंचनाच्या साधनांचा अभाव आहे. माेजक्याच शेतकऱ्यांकडे सिंचनाची साेय असल्याने ते वर्षभर शेती कसत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची साेय नाही, असे शेतकरी पावसाच्या पाण्यावर शेती करतात. जाेगीसाखरा परिसरात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार २७-२८ वर्षांपूर्वी गावालगतच्या नाल्यावर सिंचनासाठी बंधारे बांधण्यात आले. परंतु त्यांचा उपयाेग शेतकऱ्यांना झाला नाही. नाल्यावरील बंधाऱ्यातून पाणी नेण्यासाठी मोठे पाॅवर हाऊस बांधून माेटारीसुद्धा बसवण्यात आल्या. परंतु शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्थापन समिती गठित करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यासाठी सिंचन विभागाने लक्ष घातले नाही. परिणामी शेतकऱ्यांचे संघटन न झाल्यामुळे सिंचनाची परिपूर्ण सोय होऊ शकली नाही. सिंचनापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले. शेतकऱ्यांच्या शेतात एकही थेंब पाणी न जाता लाखो रुपये पाण्यात गेले. त्याला सिंचन विभागासोबतच लाभ घेणारे शेतकरीही तेवढेच जबाबदार आहेत.

जाेगीसाखरा परिसरात बहुतांश शेतकऱ्यांनी शेतजमिनीत बाेअर मारले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी तळाला गेले. सिंचनाशिवाय शेती नाही, हे पटल्याने या परिसरातील शेतकरी सिंचनाची साेय करण्यासाठी धडपडत आहेत. शासनाने नाल्यावरील जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बाॅक्स

लाभ नसतानाही शेती ओलिताखाली

जाेगीसाखरालगतच्या नाल्यावर बंधारे बांधून येथून शेतापर्यंत पाणी पाेहाेचविण्यासाठी प्रत्येक विहिरीमध्ये मोठी पाईपलाईन आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या; परंतु सिंचन याेजना पूर्णपणे कार्यान्वित न झाल्याने तिचा उपयाेग शेतकऱ्यांना याेग्यप्रकारे हाेऊ शकला नाही. शेताजवळ सिंचन बंधारे असल्याची नोंद सात-बारावर असल्यामुळे शेती ओलिताखाली असल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ घेता येत नाही. बहुतांश शेतकरी अल्पशिक्षित असल्याने त्यांनी सात-बारावरील ही नाेंद काढली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बंधाऱ्याची दुरुस्ती करावी किंवा शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ द्यावा, अशी मागणी हाेत आहे.