शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

पुणे कराराचा बाबासाहेबांनीच केला होता धिक्कार

By admin | Published: September 25, 2015 2:01 AM

महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये १९३२ साली पुणे करार झाला होता.

जाहीर व्याख्यान : सुरेश माने यांचे प्रतिपादनगडचिरोली : महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये १९३२ साली पुणे करार झाला होता. या करारावर स्वाक्षरी करण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुळीच इच्छा नव्हती. मात्र देशातील बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन नाईलाजास्तव या करारावर स्वाक्षरी करावी लागली. याचे परिणाम दिसून आल्यानंतर १९४२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत:च या कराराचा धि:क्कार केला होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले. बहुजन रिपब्लिकन आंबेडकर राईट्स सोशल मुव्हमेंटद्वारा गडचिरोली येथे गुरूवारी पुणे करार धिक्कार दिनानिमित्त ‘पेसा कायदा समज आणि गैरसमज, पुणे करार व आरक्षण’ या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना अ‍ॅड. सुरेश माने बोलत होते. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दशरथ मडावी, सिद्धार्थ पाटील, महेश राऊत, आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदू नरोटे, संभाजी ब्रिगेडचे गणेश बावनवाडे, प्रा. संजय मगर, राजीव झोडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना अ‍ॅड. डॉ. सुरेश माने म्हणाले की, गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने दलितांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र याला महात्मा गांधींनी विरोध करून येरवाडा तुरूंगात उपोषण सुरू केले व स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीस विरोध केला. या कालावधीत देशात अशांतता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करार करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली. मात्र या करारावरील स्वाक्षरीबाबत डॉ. बाबासाहेब स्वत: असमाधानी होते. १९४२ मध्ये त्यांनी स्वत: या कराराचा धिक्कार केला. ‘स्टेट आॅफ मायनॉरिटी’ या ग्रंथातसुद्धा पुणे कराराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फेही यापूर्वी अनेक धिक्कार सभा घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ बाबासाहेबांनी पुणे करारावर स्वाक्षरी केली. म्हणून त्याचा उदोउदो करणे हा मोेठा गैरसमज असल्याचे प्रतिपादन केले. सिद्धार्थ पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, राजकीय आरक्षण १० वर्षासाठी दिले होते. त्याची मुदत वाढविली जात आहे. शैक्षणिक व नोकऱ्यांच्या आरक्षणाला कोणीच धक्का लावू शकत नाही. त्याबाबतची नोंद राज्यघटनेत करण्यात आली असल्याचे प्रतिपादन केले. पेसा कायद्याबाबत मार्गदर्शन करताना महेश राऊत यांनी केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी पेसा कायद्याचा आधार घेऊन आदिवासी व गैरआदिवासी यांच्यामध्ये भांडण लावले जात असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक डॉ. कैलाश नगराळे, संचालन रितेश अंबादे तर आभार राज बन्सोड यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)