शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

समाजात विचार पेराल तर ५०० वर्षे टिकतील

By admin | Updated: January 13, 2017 00:44 IST

वैचारिकतेच्या आधारावर समाज प्रगती साधू शकतो. ज्याप्रमाणे शेतकरी धान्य पेरतो तर ते त्याला वर्षभर पुरतात.

ज्ञानेश महाराव यांचे प्रतिपादन : कमल-गोविंद प्रतिष्ठानतर्फे विद्याभारती कन्या विद्यालयात व्याख्यानगडचिरोली : वैचारिकतेच्या आधारावर समाज प्रगती साधू शकतो. ज्याप्रमाणे शेतकरी धान्य पेरतो तर ते त्याला वर्षभर पुरतात. समाजात नीतीयुक्त माणसे निर्माण केल्यास ते ५० वर्ष पुरतील. त्याचप्रमाणे समाजात सामाजिकतेचे विचार पेरल्यास ते ५०० वर्षे टिकतील, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी गुरूवारी केले. कमल-गोविंद स्मृतीप्रतिष्ठानच्या वतीने गो. ना. मुनघाटे यांच्या जयंती निमित्ताने स्थानिक विद्याभारती कन्या विद्यालयात आयोजित ‘उठावा महाराष्ट्र देश’ व्याख्यानात महाराव बोलत होते. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार होते. यावेळी दंडकारण्य शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष तथा कमल-गोविंद प्रतिष्ठानचे आमंत्रक प्राचार्य भैय्यासाहेब ठाकरे, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, कमल-गोविंद प्रतिष्ठानचे संचालक अनिल मुनघाटे, लोकविज्ञान प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष डॉ. कल्पना मुनघाटे उपस्थित होत्या. याप्रसंगी पुढे बोलताना ज्ञानेश महाराव म्हणाले, समाज अद्यापही विचारांनी जागरूक झालेला नाही. डोक्यावरती काय घ्यायचे व डोक्यातून काय फेकायचे ते अद्यापही समाजाला कळलेले नाही. देशात माणसापेक्षा दगड मोठे होत आहेत, ही बाब देशासाठी धोकादायक असून असा देश कधीही मोठा होऊ शकत नाही. गेल्या ३० वर्षांपासून राज्यात लोकांमध्ये भ्रम पसरवून भ्रामक कल्पना व धार्मिक अवडंबर माजविला जात आहे. त्यामुळे माणसाला भावनेपेक्षा बुध्दीने अधिक विचार करणे गरजेचे आहे. मेंदूला केवळ दगड बनवून ठेवलेले चालणार नाही. दिशा शोधायला लागल्यास आयुष्याची दुर्दशा झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादनही ज्ञानेश महाराव यांनी केले. व्याख्यानाला कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर, संस्थाध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे व अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान छायाचित्र प्रदर्शनीतील विजेत्यांसह प्रोत्साहन बक्षीस मिळविणाऱ्या स्पर्धकांचा रोख पारितोषिक व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रास्ताविक अनिल मुनघाटे तर आभार स्मिता लडके यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)