शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
3
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
4
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
5
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
6
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
7
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
8
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
9
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
10
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
11
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
12
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
13
'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
14
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
15
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
16
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
17
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
18
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
19
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
20
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीने ४९ लाखांचे नुकसान

By admin | Updated: August 17, 2015 01:19 IST

एप्रिल महिन्यापासून पावसासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे ४९ लाख रूपयांचे नुकसान झाले असून यामध्ये सहा नागरिक व ७२ पाळीव जनावरांना जीव गमवावा लागला आहे.

गडचिरोली : एप्रिल महिन्यापासून पावसासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे ४९ लाख रूपयांचे नुकसान झाले असून यामध्ये सहा नागरिक व ७२ पाळीव जनावरांना जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर २४५ पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीला चार दिवस मुसळधार पाऊस पडला होता. त्या चार दिवसांच्या पावसामुळे जिल्हाभरातील नद्यांना पूर आला होता. त्या कालावधीत सर्वाधिक नुकसान भामरागड, एटापल्ली तालुक्यातील नागरिकांचे झाले होते. त्यानंतर मात्र पावसाने उसंत घेतल्याने फारसे नुकसान झाले नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या जमिनीमधील खडक अत्यंत दणकट आहे. त्यामुळे भूकंपासारख्या आजपर्यंत तरी घडल्या नाही. मात्र नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वाधिक नुकसान पावसामुळे होते. गडचिरोली जिल्ह्यात राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडते. त्याचबरोबर अनेक नदी व नाले आहेत. या नदी नाल्यांवर अजूनही पूल बांधण्यात आले नाहीत. त्यामुळे रस्ता ओलांडताना बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना पावसाळ्याच्या दिवसात घडतात.
१ एप्रिल ते १० आॅगस्ट या कालावधीत पावसामुळे एकूण ४८ लाख ७४ हजार ३११ रूपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यामध्ये घर पडणे, जनावरे वाहून जाणे आदींचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबंधित नागरिकांना प्रशासनाने तत्काळ मदत करावी, असे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत. त्यामुळे नुकसान होताच तीन ते चार दिवसांच्या आतच तहसीलदारांच्या मार्फतीने आर्थिक मदत संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचविली जाते. आतापर्यंत ३२ लाख ७९ हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. अजूनही १५ लाखांची मदत देणे शिल्लक आहे. (नगर प्रतिनिधी)